शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जिल्हा प्रदूषण नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:01 IST

जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याची बाब सुध्दा पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याची बाब सुध्दा पुढे आली आहे.रेड मार्क असलेल्या उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भात सूचना संबंधित कंपनीला दिली जाते. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योगांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मिल असून यांची प्रदूषण नियंत्रण तपासणी झालीच नाही. राईस मिल मधून फक्त धान भरडाई करुन तांदूळ बनविणाºया २०० तर उष्णा राईस तयार करणाºया ६० राईस मिल आहेत. तांदूळ तयार करण्याºया राईस मिल यांना प्रदूषण मंडळ प्लेन मिल तर उष्णा तांदूळ काढणाºया मिलांना पॅरामीट राईसमिल म्हणून संबोधतात.या राईस मिलमुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईस मिलपासून होणाºया प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे यंत्र शहरात नाही. गोंदिया जिल्हाची निर्मिती होऊन २० वर्षे होत असताना गोंदियात प्रदूषण वाढत आहे. मात्र येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय नाही. किंवा प्रदूषण मोजणारे केंद्रही नाही. प्रदूषण मोजणारे केंद्र शासनातर्फे देण्यात आले नाही. परंतु त्या दिशेने प्रस्तावही पाठविण्यात आला नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची संख्या वाढत असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या दीड लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. परंतु राईस मिलमधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुध्दा दुुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण मोजणाºया केंद्रासाठी संबंधीत विभागाकडून तसा प्रस्तावही पाठविण्यात आलेला नाही.

पावसाळयात निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत नगर परिषदेच्या माध्यमातून मान्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात आहे. यांतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. याशिवाय लवकरच एक विशेष बैठक घेवून मान्सूनसाठीचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांना त्रास होवू नये यादृष्टीने स्वच्छता विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.- अशोक इंगळे, नगराध्यक्षपावसाळयात शहरवासीयांना त्रास होतो ही बाब खरी आहे. मात्र यंदा शहरवासीयांना या त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी नगर परिषद प्रशासनाने एक महिना पूर्वीपासून कामाला सुरूवात केली आहे. मॉन्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात असून शहरातील नाल्यांवर प्रामुख्याने लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय स्वच्छता विभागाची बैठक घेऊन सर्वांना आवश्यक त्या उपाय योजनांबाबत निर्देश देण्यात आले आहे.- चंदन पाटील, मुख्याधिकारी

टॅग्स :pollutionप्रदूषण