शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

जिल्हा प्रदूषण नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:01 IST

जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याची बाब सुध्दा पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याची बाब सुध्दा पुढे आली आहे.रेड मार्क असलेल्या उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भात सूचना संबंधित कंपनीला दिली जाते. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योगांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मिल असून यांची प्रदूषण नियंत्रण तपासणी झालीच नाही. राईस मिल मधून फक्त धान भरडाई करुन तांदूळ बनविणाºया २०० तर उष्णा राईस तयार करणाºया ६० राईस मिल आहेत. तांदूळ तयार करण्याºया राईस मिल यांना प्रदूषण मंडळ प्लेन मिल तर उष्णा तांदूळ काढणाºया मिलांना पॅरामीट राईसमिल म्हणून संबोधतात.या राईस मिलमुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईस मिलपासून होणाºया प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे यंत्र शहरात नाही. गोंदिया जिल्हाची निर्मिती होऊन २० वर्षे होत असताना गोंदियात प्रदूषण वाढत आहे. मात्र येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय नाही. किंवा प्रदूषण मोजणारे केंद्रही नाही. प्रदूषण मोजणारे केंद्र शासनातर्फे देण्यात आले नाही. परंतु त्या दिशेने प्रस्तावही पाठविण्यात आला नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची संख्या वाढत असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या दीड लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. परंतु राईस मिलमधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुध्दा दुुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण मोजणाºया केंद्रासाठी संबंधीत विभागाकडून तसा प्रस्तावही पाठविण्यात आलेला नाही.

पावसाळयात निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत नगर परिषदेच्या माध्यमातून मान्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात आहे. यांतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. याशिवाय लवकरच एक विशेष बैठक घेवून मान्सूनसाठीचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांना त्रास होवू नये यादृष्टीने स्वच्छता विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.- अशोक इंगळे, नगराध्यक्षपावसाळयात शहरवासीयांना त्रास होतो ही बाब खरी आहे. मात्र यंदा शहरवासीयांना या त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी नगर परिषद प्रशासनाने एक महिना पूर्वीपासून कामाला सुरूवात केली आहे. मॉन्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात असून शहरातील नाल्यांवर प्रामुख्याने लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय स्वच्छता विभागाची बैठक घेऊन सर्वांना आवश्यक त्या उपाय योजनांबाबत निर्देश देण्यात आले आहे.- चंदन पाटील, मुख्याधिकारी

टॅग्स :pollutionप्रदूषण