शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

राज्यस्तरीय कृषी पुरस्काराच्या निवड यादीतून जिल्हा बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 9:37 PM

दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेती संस्थांना विविध कृषी पुरस्कारांंनी सन्मानित केले जाते. त्यानुसार, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मागविलेल्या प्रस्तावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र विविध पुरस्कारांच्या निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेती संस्थेचा समावेश नाही.

ठळक मुद्देशेतकरी व संस्थांचे नावच नाही : सन २०१५-१६ मधील प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेती संस्थांना विविध कृषी पुरस्कारांंनी सन्मानित केले जाते. त्यानुसार, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मागविलेल्या प्रस्तावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र विविध पुरस्कारांच्या निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेती संस्थेचा समावेश नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व शेतकरी नावापुरतेच आहेत काय? असा सवाल कृषी तज्ज्ञांकडून उपस्थित होऊ लागला आहे.कृषी क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाने प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी व शेतीविषयक संस्थांना प्रोत्साहन मिळावे हे प्रमुख उद्देश बाळगून राज्य शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्यावतीने विविध कृषी पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, कृषी भूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी पुरस्कार, कृषी सेवा रत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा आदी कृषी पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयामार्फत शेतकरी व कृषी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येते. त्यानंतर निकषांतर्गत गुणानुक्रमानुरुप पुरस्कारांसाठी निवड केली जात असते.कृषी विभागाच्या माध्यमातून पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या पुरस्काराची निवड करुन राज्य शासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्काराने शेतकरी किंबहूना शेती संस्थांना सन्मानित केले जाते.सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये मागविण्यात आलेल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने (दि.२) शासन निर्णय निर्गमित करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या शेतकरी व संस्थांची नावे जाहीर करण्यात आली.मात्र निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेतीसंस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात प्रगतीशिल शेतकरी व कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आहे की नाही? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना किंबहूना शेती संस्थांना प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात प्रेरीत करण्यात उदासीन आहे काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

टॅग्स :agricultureशेती