शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

शासनाच्या शेतकऱ्यांना भुलथापा

By admin | Updated: December 10, 2015 02:04 IST

शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली. यानंतर मळणी करून महामंडळाच्या संस्थांमध्ये विकण्यास नेत आहेत.

बाराभाटी : शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली. यानंतर मळणी करून महामंडळाच्या संस्थांमध्ये विकण्यास नेत आहेत. आधी धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना बारदाना, ग्रेडरचा लाभ झाला. परंतु काही शेतकऱ्यांनी संस्थेमध्ये धान उशीरा विक्रीकरिता नेले. मात्र धान खरेदी बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त तर झाले. पण संस्था उदासिन झाल्याचे शेतकरी बोलत आहते. त्यामुळे शासन अनेकदा शेतकऱ्यांना भुलथापा देत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदीकरिता गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी व संस्था लढा देत आहेत. जिल्हास्तराच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्याशी महामंडळ व आदिवासी सहकारी संस्थांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये शासनाने नेमून दिलेल्या प्रतिनिधींची हजेरी होती. बैठकीत संस्थांना, शेतकऱ्यांना फक्त आश्वासनच मिळाले, मात्र कमिशन बाकीच आहे. तर गोदाम भाडे, चौकीदार वेतन या बाबी पंधरा वर्षांपासून प्रलंबितच आहेत. शासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून सहकारी संस्थांनी धान खरेदी केली. परंतु यामध्येसुध्दा थोडेसे विरजण पडल्याचे दिसून येत आहे. विरजन पडण्याचे कारण म्हणजे महामंडळाकडून बारदाने कमी मिळाले तर बाकी संस्थानी उर्वरित मागील बारदाना वापरुन धान खरेदी केली. धान खरेदीची आणखी महत्वाची एक भूमिका एकच ग्रेडर हा तीन-चार संस्था चालवत आहेत. यामध्ये पुन्हा शेतकरी वर्गाचे अधिक नुकसान होताना दिसत आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था बाराभाटी यांनी धान खरेदी केली तर जेमतेम फक्त दहा दिवस झाले. यात बारदाना व ग्रेडर यांच्या अशा अनागोंदी कारभारामुळे धान खरेदी बंद पडल्याचे चित्र स्पष्ट झाले. शासनाचे नेमलेले प्रतिनिधी आणि भूमिपूत्र त्याचप्रमाणे या भागाचे मंत्री, खासदार, आमदार हे फक्त कामांचे भूमिपूजन करताना दिसतात. कार्यक्रमांचे उद्घाटन करतात. पण शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, सर्वसामान्यांच्या समस्या कधीच सोडवताना आढळत नाही. या भागातील लोकप्रतिनिधी राजकारणाचे नवनवे मंत्र जपतात. पण चिंताग्रस्त करणाऱ्या अडचणी मुळीच मार्गी लावत नाही. यांचा मोह फक्त खुर्चीचा व सफेद रंगाच्या कपड्यांचा आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नाही. प्रस्थापित सरकार आणखी शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या समस्या वाढवताना अनेक घटनांमधून पहायला मिळत आहे. (वार्ताहर)