शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

­धानपिकावर गादमाशी, तुडतुड्यासारख्या रोगांचा प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 5:00 AM

या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्धा धानावरील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याचा परिणाम धानपिकावर होईल.

वामन लांजेवारलोकमत न्यूज नेटवर्कशेंडा कोयलारी :  या परिसरात रोवणीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, धानपिकावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. नंतर अतिवृष्टीचा कहर झाल्याने हलक्या प्रतीच्या धानाला व मुख्यत्वे करून हायब्रीडला गादमाशीने ग्रासले आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काही हलक्या प्रतीच्या धानावर तुडतुड्यांचा प्रकोप दिसून येत आहे. किटकनाशकाची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, मसरामटोला, आपकारीटोला, कोहळीपार, पांढरवाणी, कोयलारी, मोहघाटा, उशिखेडा, कन्हारपायली, पाटीलटोला, सालईटोला, प्रधानटोला, नरेटीटोला व पुतळी हा आदिवासीबहुल परिसर असून, या परिसरात शेती हाच या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. सध्या हलक्या प्रतीचे धान निसवले असून, अवघ्या काही दिवसांतच कापणीयोग्य होणार आहे. मात्र पाऊस दररोज बरसत असल्याने आणि ढगाळ वातावरणाने धान पिकावर मावा, तुडतुडा, गादमाशी, खोडकिडासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.

जड धानावरही संकट - या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्धा धानावरील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याचा परिणाम धानपिकावर होईल. परिणामी, यावर्षीच्या खरीप हंगामातील धान उत्पादनात कमालीची घट होणार असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना कर्जफेडीची चिंता- यावर्षी बँकेने बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे नाकारल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. काहींनी उधार उसने करुन धानपिकाची लागवड केली, तेही रोगांच्या प्रादुर्भावाने धोक्यात आले आहे. त्यामुळे परतफेडीचा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेती व्यवसायाला जोड म्हणून या परिसरात एखाद्या छोट्यामोठ्या उद्योग धंद्याची नितांत गरज आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :agricultureशेती