शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्ह्यातील ४७ संस्थांवर अवसायनाची कारवाई

By admin | Updated: April 18, 2017 01:07 IST

मागील एका वर्षात काम व्यवस्थित नसणाऱ्या जिल्ह्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

बेरोजगार संस्था सर्वाधिक : सहकार विभागाची कारवाई गोंदिया : मागील एका वर्षात काम व्यवस्थित नसणाऱ्या जिल्ह्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. आता या संस्थांना बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. यापूर्वीही सहकार आयुक्तांच्या आदेशावरून कित्येक संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.मागील वर्षी ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यात १०१० सहकारी संस्था सुरू होत्या. एक वर्षात यातील ४७ संस्थांवर अवसायनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता ९६३ सहकारी संस्था उरल्या आहेत. या संस्थांमधील काहींजवळ योग्य ते कागदपत्र नसल्याचेही दिसून आले आहे. तसेच नोंदविण्यात आलेल्या पत्यावर संस्थाच नसल्याचेही दिसून आले आहे. एकंदर यातून संस्था बनावट असल्याचे स्पष्ट होते. यामुळेच अशा या संस्थांवर कारवाई करण्यात आल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अवसायनात काढण्यात आलेल्या संस्थांमध्ये सर्वाधीकबेरोजगारांच्या संस्था आहेत. पूर्वी राज्य शासनाकडून नोंदणीकृत बेरोजगारांना भत्ता दिला जात होता. मात्र भत्ता बंद करून बेरोजगारांच्या संस्था निर्माण करण्याची सुरूवात राज्य शासनाने केली होती. जिल्ह्यात सुमारे ३६० बेरोजगार संस्थांची नोंदणी करण्यात आली होती. नियमानुसार या संस्थांना तीन वर्षे अनुदान द्यावयाचे होते. मात्र पहिल्या वर्षी सुमारे ४४ लाख रूपयांचे अनुदान देण्यात आल्यानंतर अनुदान देणे बंद करण्यात आले. या संस्थांना कंत्राटसुद्धा द्यावयाचे होते. मात्र अनेक संस्थांचे संचालक यासाठी तयार नव्हते. कारण अशा या संस्थांची निर्मिती केवळ अनुदानासाठी करण्यात आली होती. अशात अनुदान बंद झाल्याने संस्था फक्त कागदावर होत्या. (शहर प्रतिनिधी)या संस्था निघाल्या अवसायनातज्या संस्थांवर अवसायनाची कारवाई करण्यात आली आहे त्यात पाच औद्योगिक सहकारी संस्था, एक जंगल कामगार संस्था, दोन उपसा जलसिंचन संस्था, ३० बेरोजगार संस्था, पाच ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था, एक गृहतारण संस्था, एक कर्मचारी पतसंस्था, एक अन्य प्रक्रिया संस्था तर एक पाणी वापर संस्था आहे.