शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

आठ ग्रामपंचायती ठरविणार जि.प.निवडणुकीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 18:37 IST

आमगाव नगर परिषदेतील आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारांवर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल. मात्र, या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.

ठळक मुद्देआमगाव येथील घटणार तर गोरेगावमध्ये वाढणार : वेध जिल्हा परिषद निवडणुकीचे

गोंदिया : आमगाव नगर परिषद की नगर पंचायत याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. तर नगर परिषद समाविष्ट होण्यास आठ ग्रामपंचायतीने अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत हा तिढा सुटत नाही आणि या आठ ग्रामपंचायती आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांची दिशा स्पष्ट होणार नाही.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या. परिणामी, निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुका अद्यापही घोषित केल्या नाही. त्यामुळेच मागील दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या भरवश्यावर सुरू आहे.

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत एकूण ५३ सर्कल आहे. आमगाव नगर परिषद झाल्यास आमगाव तालुक्यातील एक सर्कल कमी होणार आहे. तसे झाल्यास गोरेगाव तालुक्यात एक सर्कल वाढेल. जिल्हा परिषदेचा एक सर्कल १६ हजार मतदारांचा असतो. मात्र, आमगाव नगर परिषदेत लगतच्या पद्ममपूर, रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडंगीपार, बनगाव, माल्ही, आमगाव या ग्रामपंचायतींचा समावेश असून, या आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारावर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल; मात्र या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही.

ग्रामपंचायतींनी हीच भूमिका कायम ठेवल्यास आणि न्यायालयात गेल्यास पुन्हा पेच निर्माण होऊन निवडणुका लांबणीवर जावू शकतात. तर नवीन सर्कल तयार झाल्यास नव्याने आरक्षण काढावे लागेल, त्यामुळे या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ लागू शकतो. त्यामुळे या आठ ग्रामपंचायतींच्या भुमिकेवर जिल्हा परिषद निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे.

कुणाच्या जागा वाढणार

पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा मिळविल्या होत्या. तर काँग्रेस १६ आणि भाजपला १७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते; पण गल्ली बंगाल्याच्या वादात सर्वाधिक जागा मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. तर काँग्रेसने भाजपसह हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेत अभद्र युती केली होती; पण या निवडणुकीत थोडे वेगेळे चित्र आहे. तर सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे कुणाच्या जागा वाढणार, हे सुद्धा महत्त्वपूृर्ण ठरणार आहे.

एकाला चलो रे वरच भर

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीची सत्ता आहे; मात्र हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता कमी आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकला चलो रेचा नारा देत तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद