शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी पाणी मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:48 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी काही टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत सिंचन विभागाने दिले आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाचे संकेत : शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी काही टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत सिंचन विभागाने दिले आहे. त्यामुळे खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम सुध्दा संकटात आला आहे.खरीप हंगामानंतर जिल्ह्यातील शेतकरी रब्बी पिकांची लागवड करतात. दरवर्षी जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात तब्बल १० हजार हेक्टरने घट झाल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने देखील यंदा २५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड होण्याचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन हे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते.त्यामुळे त्याचाच अंदाज घेत शेतकरी पिकांची लागवड करतात. रब्बीसाठी बाघ व इटियाडोह, पुजारीटोला, कालीसरार प्रकल्पाचे पाणी दिले जाते. मात्र सध्या स्थितीत या प्रकल्पांमध्ये ५० ते ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर यंदा परतीचा पाऊस सुध्दा न बरसल्याने रब्बी हंगामातील धानासह कठाण पिकांना सुध्दा फटका बसण्याची शक्यता आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस व किडरोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.परिणामी धानाच्या हेक्टरी सरासरी उत्पादनात सुध्दा आठ ते दहा क्विंटलने घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढून अशी आशा शेतकऱ्यांना होती.मात्र सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने सिंचन विभागाने रब्बी हंगामासाठी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामाला सुद्धा मुकावे लागणार आहे.रब्बी हंगामात नहरांची दुरूस्तीसिंचन विभागाने यंदा ऐन रब्बी हंगामात नहराच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची आशा पूर्णपणे धुरसर झाली आहे. तर सिंचन विभागाने नेमके रब्बी हंगामा दरम्यानच नहर दुरूस्तीच्या कामाचे नियोजन का केले असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.पाणीटंचाईची शक्यतासिंचन प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भूजल पातळीत घट झाली असून उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई