शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

रब्बी हंगामासाठी पाणी मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:48 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी काही टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत सिंचन विभागाने दिले आहे.

ठळक मुद्देसिंचन विभागाचे संकेत : शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी काही टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत सिंचन विभागाने दिले आहे. त्यामुळे खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम सुध्दा संकटात आला आहे.खरीप हंगामानंतर जिल्ह्यातील शेतकरी रब्बी पिकांची लागवड करतात. दरवर्षी जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात तब्बल १० हजार हेक्टरने घट झाल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने देखील यंदा २५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड होण्याचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन हे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते.त्यामुळे त्याचाच अंदाज घेत शेतकरी पिकांची लागवड करतात. रब्बीसाठी बाघ व इटियाडोह, पुजारीटोला, कालीसरार प्रकल्पाचे पाणी दिले जाते. मात्र सध्या स्थितीत या प्रकल्पांमध्ये ५० ते ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर यंदा परतीचा पाऊस सुध्दा न बरसल्याने रब्बी हंगामातील धानासह कठाण पिकांना सुध्दा फटका बसण्याची शक्यता आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस व किडरोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.परिणामी धानाच्या हेक्टरी सरासरी उत्पादनात सुध्दा आठ ते दहा क्विंटलने घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढून अशी आशा शेतकऱ्यांना होती.मात्र सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने सिंचन विभागाने रब्बी हंगामासाठी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामाला सुद्धा मुकावे लागणार आहे.रब्बी हंगामात नहरांची दुरूस्तीसिंचन विभागाने यंदा ऐन रब्बी हंगामात नहराच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची आशा पूर्णपणे धुरसर झाली आहे. तर सिंचन विभागाने नेमके रब्बी हंगामा दरम्यानच नहर दुरूस्तीच्या कामाचे नियोजन का केले असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.पाणीटंचाईची शक्यतासिंचन प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भूजल पातळीत घट झाली असून उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई