शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

हिंसेचे वातावरण संपविण्याची शक्ती धम्मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:35 IST

जगात बौद्ध धम्माचे अनुयायी शांतीदूत बनून अहिंसेचा संदेश प्रचारित करीत आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : संजयनगर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जगात बौद्ध धम्माचे अनुयायी शांतीदूत बनून अहिंसेचा संदेश प्रचारित करीत आहेत. त्यामुळेच आज पूर्ण जगात हिंसेचे वातावरण संपविण्याची ताकद भगवान बुद्धांच्या धम्मात असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शहरातील संजयनगरात नवयुवक बौद्ध सेवा समितीच्यावतीने आयोजीत ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, राजकारणात सतत काम करीत असताना यासारख्या सामाजिक कार्यक्रमांतून मनाला शांती मिळते. तसेच धम्मापासून प्रेरीत होऊन लोकहितांची कामे करण्याची प्रेरणा मिळते. यातूनच धम्माच्या अनुयायांनी प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास कायम केला आहे, त्यातूनच बौद्ध समुदायाच्या विकास कामांना प्रामुख्याने पुढे वाढविले जात आहे. आम्ही क्षेत्रातील सामान्य नागरिकांची लढाई लढण्याचे काम करून विकासाच्या माध्यमातून जनतेत पकड कायम केली आहे. मात्र काही बडबोले नेते जनतेत शक्ती प्रदर्शन करून आपले महत्त्व कायम करण्याची इच्छा बाळगत असून जनतेला याची जाणीव असल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमानिमित्त नागपूरच्या महेंद्र-विरेंद्र बोरडे यांच्या ग्रुपच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन आयोजक देवा रूसे यांनी केले. आभार समितीचे अध्यक्ष मनिष रामटेके यांनी मानले.कार्यक्रमाला नगरसेवक भागवत मेश्राम, सुनील तिवारी, बंटी बानेवार, विष्णू नागरीकर, अनील सुखदेवे, सुशिल ठवरे, राजेश कापसे, अपूर्व अग्रवाल, यशपाल डोंगरे, ज्योतीप्रकाश गजभिये, सतीश मेश्राम, विजय बावनकर, श्याम चौरे, अनील डोंगरे, दिलीप बोरकर, विकास चव्हाण, बंटी भालाधरे, आकाश गडपायले, नितीन डोंगरे, अजय मोरे, मनोज डहाट, विनोद कांबळे, गौतम डहाट, राजेंद कांबळे, गौतम रंगारी, मयूर मेश्राम, दिनेश उके, संजय गणवीर, सतीश कावडे, लक्ष्मीकांत डहाट, आनंद राहूलकर यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.