शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:59 IST

चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांपैकी तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना स्थानिक पाणी पुरवठा मंडळाच्या सहाय्याने चालविल्या जातात. त्यामध्ये मंडळांना योजना चालविताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यासाठी या पाणी पुरवठा योजनांच्या समस्या मार्गी लावा.

ठळक मुद्देतरोणे यांचा पाठपुरावा : मुकाअंना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांपैकी तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना स्थानिक पाणी पुरवठा मंडळाच्या सहाय्याने चालविल्या जातात. त्यामध्ये मंडळांना योजना चालविताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यासाठी या पाणी पुरवठा योजनांच्या समस्या मार्गी लावा.तालुक्यातील २००७-०८ मध्ये चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे बांधकाम पूर्ण होऊनही जिल्हा परिषदेला हस्तांतरीत न केल्यामुळे तत्कालीन सरपंचांनी एकत्र येऊन मंडळ स्थापन करुन योजना चालविण्यास सुरुवात केली. एकूण ५० गावांना मागील १० वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या योजना करीत आहेत. ४ वर्षापासून वाढलेले वीज बिल, मजुरी, योजना जुनी झाल्यामुळे देखभाल दुरुस्तीवर येणारा खर्च, मोटारपंप दुरुस्ती खर्च, रसायनाचे वाढलेले दर व इतर बाबींचा विचार करता पाणी पट्टीच्या मागणीतून योजनांची वार्षीक देखभाल दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. ३ वर्षापासून योजनांना देखभाल दुरुस्तीकरीता कुठलाही निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळे मंडळांना नळ धारकांकडून घेतलेली अनामत रक्कमही खर्च करावी लागली.रसायन खरेदीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध असूनही मागील १० वर्षात रसायनाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे रसायनांचाही भार मंडळांवर पडला. गाव स्तरावरील टाकीची दुरुस्ती, स्वच्छता व वितरण व्यवस्थेचे नियोजन करणे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. परंतु तालुक्यातील कोणत्याच ग्रामपंचायत मंडळांना सहकार्य करत नाही. वीज देयकाचे ५० टक्के अनुदान हे मागील २ वर्षापासून खूप उशीरा प्राप्त झाल्यामुळे व २०१७-१८ चे अनुदान अजूनपर्यंत प्राप्त न झाल्यामुळे वीज बिल थकीत होऊन अतिरीक्त दंड मंडळांना भरावा लागतो. चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांवरील विद्युतीकरण व पंप व्यवस्था खुप जुन्या तंत्रज्ञानाची असल्यामुळे वीज बिलामध्ये ३० ते ४० टक्के अतिरीक्त भार मंडळावर पडत आहे. योजनेमध्ये काम करणारे मजुर यांना मजुरी मिळणे गरजेचे आहे. परंतु त्यांना मजुरी देण्यास मंडळ असमर्थ आहे. त्यामुळे काम करणाऱ्या मजुरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात शासकीय नियमानुसार मजुरी मिळण्यासाठी याचीका दाखल केली आहे. जलाशयातील पाणी उचल करण्याचे पाणी कर मंडळांना भरणा करणे कठीन जात आहे. तरी हे सुध्दा जिल्हा परिषदेने पाटबंधारे विभागाकडे जमा करावे.वरील समस्यांचे निराकरण केल्यास सदर योजना भविष्यात चालविणे शक्य होईल तरी सदर सर्व समस्यांची सोडवणूक करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन दिले. निवेदन देताना जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, निलकंठ बोरकर, कालीदास पुस्तोडे, रतीराम राणे, शारदा नाकाडे, लोकपाल गहाणे हे उपस्थित होते. 

टॅग्स :Waterपाणी