शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

अटकेतील आरोपीच कोठडीतील मृत्यूचे ‘आय विटनेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला.  

ठळक मुद्देपाठीवर आढळले व्रण : न्यायालयीन चौकशीची होत आहे मागणी

नरेश रहिलेलाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीचा संशयास्पदरीत्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूसंदर्भात मृताचे नातेवाईक पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करीत आहेत. तर पोलीस हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आहे हे सांगत आहेत. परंतु आमगावच्या पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या राजकुमार अभयकुमार धोतीचा (३०)  मृत्यू कशाने झाला याची साक्ष देणारे ‘आय विटनेस’ त्याच्या सोबत अटक झालेले दोन तरुण आहेत.आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला.  राजकुमार याला अटक केले तेव्हा त्याच्यासोबत सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोघेही अटकेत असल्याने ते तिघेही सोबतच होते. राजकुमार याच्यासोबत काय काय झाले. मारहाण झाली किंवा नाही याची माहिती देणारे हे दोघेही ‘आय विटनेस’ आहेत. त्यांना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ते पोलीस कोठडीत सोबत असतानाच हा प्रकार घडल्याने राजकुमार धोतीचा मृत्यू नेमका कशाने झाला याची हे दोघेच साक्ष देतील. मात्र या घटने नंतर आमगाव शहरात पोलिसां विरोधात चांगलाच रोष दिसून आला. आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

न्यायालयीन चौकशीची होतेय मागणीपोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येतो. परंतु या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन प्रक्रियेतून व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. न्यायालयीन चौकशीतून सत्यता पुढे येईल. पोलीस कोठडीत झालेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू नेमका कशाने हे विसेरा अहवाल सांगेल. परंतु या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाल्यास ‘दूध का दूध और पानी का पानी होईल’ असेच म्हटले जात आहे.

शरीरावरचे व्रण काय सांगून जातात?राजकुमार धोती याच्या शरीरावर व्रण असल्याचा फोटो नातेवाईक व समाजमाध्यमांनी काढला. त्याच्या शरीरावर व्रण व जखमा असल्याने त्याला मारहाण तर झाली नाही. मारहाण झाली तर त्याचे साक्षीदार अटक असलेले सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोन आरोपी आहेत. परंतु ते सध्या कोठडीत असतांना त्यांच्यावर पोलिसांचा दबाव असू नये म्हणून आता त्यांचे बयान घेऊ नये. ते सुटून घरी परतल्यावर त्यांचे बयान नोंदवायला पाहिजे, असाच सूर घटनास्थळावर उमटत होता. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायेथील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच पोलीस ठाण्यात आरोपी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरम कोरोटे यांनी केली आहे. मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कोरोटे सकाळपासून ठाम मांडून होते. पोलीस ठाण्यात शेकडो नागरिकांनी मृताला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांविरोधात नारेबाजी केली. मृत राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आ. कोरोटे यांनी केला आहे. मृत तरुण मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.  कुटुंबात एकटा असल्याने कुटुंबाचा आधार हिरावला.  मृताच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. कोरोटे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, संजय बहेकार, महेश उके, मुन्ना गवळी यांनी केली आहे.पोलीस निरीक्षकासह चौघे जण निलंबित राजकुमार धोती याच्या मृत्यू प्रकरणात आमगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना कारणीभूत ठरवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आमगावचे ठाणेदार सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, ठाणेदारांचा वाहन चालक पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे (ब.क्र.१०१४) व पोलीस शिपाई अरुण उईके (ब. क्र. १८७७) यांचा समावेश आहे. या चौघांना पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. आमगाव पोलिसांनी पोलिसांची प्रतिमा मलीन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ व महाराष्ट्र पोलीस शिक्षा व अपील अधिनयम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम (१-अ) (एक) (ब) अन्वये पोलीस अधीक्षकांनी चौघांना निलंबित केले आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेDeathमृत्यू