शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अटकेतील आरोपीच कोठडीतील मृत्यूचे ‘आय विटनेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला.  

ठळक मुद्देपाठीवर आढळले व्रण : न्यायालयीन चौकशीची होत आहे मागणी

नरेश रहिलेलाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीचा संशयास्पदरीत्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूसंदर्भात मृताचे नातेवाईक पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करीत आहेत. तर पोलीस हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आहे हे सांगत आहेत. परंतु आमगावच्या पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या राजकुमार अभयकुमार धोतीचा (३०)  मृत्यू कशाने झाला याची साक्ष देणारे ‘आय विटनेस’ त्याच्या सोबत अटक झालेले दोन तरुण आहेत.आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला.  राजकुमार याला अटक केले तेव्हा त्याच्यासोबत सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोघेही अटकेत असल्याने ते तिघेही सोबतच होते. राजकुमार याच्यासोबत काय काय झाले. मारहाण झाली किंवा नाही याची माहिती देणारे हे दोघेही ‘आय विटनेस’ आहेत. त्यांना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ते पोलीस कोठडीत सोबत असतानाच हा प्रकार घडल्याने राजकुमार धोतीचा मृत्यू नेमका कशाने झाला याची हे दोघेच साक्ष देतील. मात्र या घटने नंतर आमगाव शहरात पोलिसां विरोधात चांगलाच रोष दिसून आला. आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

न्यायालयीन चौकशीची होतेय मागणीपोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येतो. परंतु या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन प्रक्रियेतून व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. न्यायालयीन चौकशीतून सत्यता पुढे येईल. पोलीस कोठडीत झालेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू नेमका कशाने हे विसेरा अहवाल सांगेल. परंतु या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाल्यास ‘दूध का दूध और पानी का पानी होईल’ असेच म्हटले जात आहे.

शरीरावरचे व्रण काय सांगून जातात?राजकुमार धोती याच्या शरीरावर व्रण असल्याचा फोटो नातेवाईक व समाजमाध्यमांनी काढला. त्याच्या शरीरावर व्रण व जखमा असल्याने त्याला मारहाण तर झाली नाही. मारहाण झाली तर त्याचे साक्षीदार अटक असलेले सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोन आरोपी आहेत. परंतु ते सध्या कोठडीत असतांना त्यांच्यावर पोलिसांचा दबाव असू नये म्हणून आता त्यांचे बयान घेऊ नये. ते सुटून घरी परतल्यावर त्यांचे बयान नोंदवायला पाहिजे, असाच सूर घटनास्थळावर उमटत होता. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायेथील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच पोलीस ठाण्यात आरोपी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरम कोरोटे यांनी केली आहे. मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कोरोटे सकाळपासून ठाम मांडून होते. पोलीस ठाण्यात शेकडो नागरिकांनी मृताला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांविरोधात नारेबाजी केली. मृत राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आ. कोरोटे यांनी केला आहे. मृत तरुण मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.  कुटुंबात एकटा असल्याने कुटुंबाचा आधार हिरावला.  मृताच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. कोरोटे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, संजय बहेकार, महेश उके, मुन्ना गवळी यांनी केली आहे.पोलीस निरीक्षकासह चौघे जण निलंबित राजकुमार धोती याच्या मृत्यू प्रकरणात आमगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना कारणीभूत ठरवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आमगावचे ठाणेदार सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, ठाणेदारांचा वाहन चालक पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे (ब.क्र.१०१४) व पोलीस शिपाई अरुण उईके (ब. क्र. १८७७) यांचा समावेश आहे. या चौघांना पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. आमगाव पोलिसांनी पोलिसांची प्रतिमा मलीन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ व महाराष्ट्र पोलीस शिक्षा व अपील अधिनयम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम (१-अ) (एक) (ब) अन्वये पोलीस अधीक्षकांनी चौघांना निलंबित केले आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेDeathमृत्यू