शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या लाईफ लाईनकडे विभागाची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. सिरपूर आणि कालीसरार धरणाच्या मदतीने या धरणाद्वारे पाच ही तालुक्यांना उन्हाळी पिकासाठी पाणी पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देसहा महिन्यापासून वीज पुरवठा खंडित : निरीक्षण कक्ष झाले खंडार,निधीची प्रतीक्षा

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यातील हजारो गावांची लाईफलाईन असलेल्या सालेकसा तालुक्यातील वाघ नदीवरील पुजारीटोला धरणाची सुरक्षा व्यवस्था वाºयावर असल्याचे चित्र आहे. या धरण क्षेत्राचा विद्युत पुरवठा मागील सहा महिन्यांपासून खंडित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. सिरपूर आणि कालीसरार धरणाच्या मदतीने या धरणाद्वारे पाच ही तालुक्यांना उन्हाळी पिकासाठी पाणी पुरवठा केला जातो. या धरणाच्या भरवशावर काही गावांना पिण्याच्या पाण्याचा सुध्दा पुरवठा केला जातो. एवढ्या महत्त्वपूर्ण धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे मात्र संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सालेकसा तालुक्याच्या कोटरा ग्रामपंचायत परिसराच्या हद्दीत असलेला पुजारीटोला धरण कोटरा गावाजवळ वाघनदीवर तयार करण्यात आला आहे. याला कोटरा डॅम म्हणून सुध्दा ओळखले जाते. या धरणातून दोन मोठे कालवे काढण्यात आले आहे. एक कालवा सालेकसा तालुक्यात जवळपास १९ किमीचा आहे. तालुक्यातील शेतीला सिंचन करीत पुढे मध्यप्रदेशात प्रवेश करुन बालाघाट जिल्ह्याच्या लांजी, किरणापूर तालुक्यातील मोठ्या भूभागातील शेतीला सिंचनाची सोय केली जाते. तर दुसºया कालव्याच्या मदतीने सालेकसा, आमागव, गोंदिया तालुका परिसरातील शेतीला सिंचनाची सोय करुन देणारा ठरतो. याशिवाय या धरणातून वाघनदीला पाणी सोडून नदीकाठावरील अनेक गावांची तहान भागविली जाते. अशा महत्त्वाच्या धरणाला सुरक्षित ठेवून व्यवस्थितरित्या चालविण्याची संयुक्त जवाबदारी दोन्ही राज्याची आहे. पंरतु दोन्ही राज्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हा भाग नक्षलग्रस्त भागामध्ये मोडत असून या धरणावरील वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या परिसरात जाणे धोक्याचे झाले आहे. चौकीदारांना सुध्दा येथे राहण्यास भीती वाटत असल्याचे सांगितले.८२ हजाराचे वीज बिल थकीतपुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी मोटारपंप लावण्यात आले आहे. त्या चालविण्यासाठी सतत विजेची गरज असते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धरण परिसर व वसाहतीमध्ये प्रकाश व्यवस्था आवश्यक आहे. यासाठी मागील अनेक वर्षापासून वापरात असलेल्या विजेच्या बिलाची रक्कम भरण्यात आली नाही.८२ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरणे येथील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.दरवाजे उघड्यासाठी स्टॅन्ड बाय जनरेटरविद्युत पुरवठा खंडीत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी स्टॅन्डबाय जनरेटरचा वापर केला असतो. पावसाळ्यात अनेकवेळा आपातकालीन परिस्थिती निर्माण होत असून रात्री बेरात्री दरवाजे उघडण्याची वेळ येते अशात वीज पुरवठा खंडीत असणे धोक्याचे ठरु शकते.वीज बिलाची रक्कम भरुन विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही निधी प्राप्त झाला नसल्याने विद्युत बिल भरण्यात आले नाही. परिणामी विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही.- प्रियम शुभम, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग सालेकसा.

टॅग्स :Damधरणelectricityवीज