शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:46 IST

गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची मागणी : दुपारी पाळीत रेल्वे गाडी सुरू करा,रेल्वेला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.गोंदिया-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर येथे प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. गोंदिया-डोंगरगढ मार्गावर डोंगरगढ येथे प्रसिद्ध बम्लेश्वरी मातेचे देवस्थान आहे.या दोन्ही ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. त्यांच्यासाठी नवरात्री उत्सवादरम्यान चंद्रपूर, डोंगरगढ व डोंगरगढ-चंद्रपूर (बल्लारशाह) रेल्वेगाडी चालविण्यात यावी.जेणेकरुन महाराष्टÑ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील लाखो भाविकांंना दर्शनाचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध होईल, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आठही तालुक्यात गोंदिया हे मध्यभागी असल्याने विविध कामासाठी जिल्हावासीयांना गोंदियाला यावे लागते.काम आटोपल्यावर मात्र गावाला जाण्यासाठी दुपार पाळीत रेल्वेगाडी नसल्याने गोरेगाव, सडक अर्जुनी, सौंदड, पांढरी, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, वडेगाव, अरुणनगर, वडसा येथील नागरिक व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हीच अवस्था गोंदिया-दरेकसा परिसरातील नागरिकांची आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डोंगरगढ व बल्लारशाह मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी रेल्वे विभागाकडे केली आहे.नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची गैरसोयबाहेर गावावरुन सकाळी गोंदियाला आलेल्या नागरिकांना दुपारच्या पाळीत गाडीच नसल्यामुळे सायंकाळी शिवाय स्वत:च्या गावाला परत जाता येत नाही. या मार्गावर दळण-वळणाची साधने नसल्याने दरेकसा, जमाकुडो, विचारपूर, चांदसुरज या नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या दोन्ही मार्गावर दुपार पाळीत लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने गोंदियाला आलेल्या नागरिकांना सायंकाळच्या गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. रेल्वे प्रवाशांच्या उदासीनतेमुळे गोंदिया-डोंगरगढ व गोंदिया-वडसा दरम्यान लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच वेळेचा अपव्यय ही होत आहे.