शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:46 IST

गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची मागणी : दुपारी पाळीत रेल्वे गाडी सुरू करा,रेल्वेला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.गोंदिया-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर येथे प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. गोंदिया-डोंगरगढ मार्गावर डोंगरगढ येथे प्रसिद्ध बम्लेश्वरी मातेचे देवस्थान आहे.या दोन्ही ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. त्यांच्यासाठी नवरात्री उत्सवादरम्यान चंद्रपूर, डोंगरगढ व डोंगरगढ-चंद्रपूर (बल्लारशाह) रेल्वेगाडी चालविण्यात यावी.जेणेकरुन महाराष्टÑ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील लाखो भाविकांंना दर्शनाचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध होईल, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आठही तालुक्यात गोंदिया हे मध्यभागी असल्याने विविध कामासाठी जिल्हावासीयांना गोंदियाला यावे लागते.काम आटोपल्यावर मात्र गावाला जाण्यासाठी दुपार पाळीत रेल्वेगाडी नसल्याने गोरेगाव, सडक अर्जुनी, सौंदड, पांढरी, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, वडेगाव, अरुणनगर, वडसा येथील नागरिक व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हीच अवस्था गोंदिया-दरेकसा परिसरातील नागरिकांची आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डोंगरगढ व बल्लारशाह मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी रेल्वे विभागाकडे केली आहे.नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची गैरसोयबाहेर गावावरुन सकाळी गोंदियाला आलेल्या नागरिकांना दुपारच्या पाळीत गाडीच नसल्यामुळे सायंकाळी शिवाय स्वत:च्या गावाला परत जाता येत नाही. या मार्गावर दळण-वळणाची साधने नसल्याने दरेकसा, जमाकुडो, विचारपूर, चांदसुरज या नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या दोन्ही मार्गावर दुपार पाळीत लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने गोंदियाला आलेल्या नागरिकांना सायंकाळच्या गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. रेल्वे प्रवाशांच्या उदासीनतेमुळे गोंदिया-डोंगरगढ व गोंदिया-वडसा दरम्यान लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच वेळेचा अपव्यय ही होत आहे.