शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, गुळवेलला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

गोंदिया: संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपली ...

गोंदिया: संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक औषधे, परिसरातील विविध औषधी वनस्पतींचा काढा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहेत. त्यामुळे आता आपल्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या वनौषधींचे महत्त्व कोरोनामुळे वाढत आहे. यामध्ये विशेषकरून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गुळवेल, पुदिना, गवती चहा, कोरफड, शतावरी, कडुनिंब, पिंपळ या वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे. परिसरात सर्वत्र आढळून येणाऱ्या कडुनिंबासह गवती चहाचा आज मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. विविध रोपवाटिकांमध्ये या रोपांच्या मागणीतही वाढ झाली आहे. कडुनिंबाच्या पानाचा, सालीचा काढा तसेच पानांचा ज्यूस काढून तसेच चहामध्ये अद्रक, गवती चहासारख्या वनस्पतींचा वापर करीत आहेत. एकंदरीत नैसर्गिक वनसंपत्तीने विपुल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

..........................................................

सध्या कोरोना वाढला असल्याने नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. ज्यांना औषधी वनस्पतींची जाण आहे, ते लोक कडुनिंब, गवती चहा, गुळवेल, वड, पिंपळ अशा रोपांची आमच्याकडे मागणी करीत आहेत. औषधी वनस्पतींमध्ये मोठी ताकद आहे. ज्या जाणकारांना हे माहीत आहे ते लोक खरेदीसाठी येत आहेत. घरी आम्ही काढाच वापरत आहोत.

- बिसेन, नर्सरी मालक राधाकृष्ण वॉर्ड रिसामा, आमगाव.

.............

आमच्या भवभूती महाविद्यालयातील वनस्पती उद्यानात इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, गुळवेल, शतावरी, मेंथा, बच्चनाग (वेखंड), लेंडीपिपळी, गुगूळ, भुईनिंब, जपानी सांबर, गुलबकावळी, तुळस, मुसळी अशी विविध वनस्पती लावली आहेत. या वनस्पतीपासून इम्युनिटी वाढविण्यास खूप मदत होते.

- डॉ. श्रीराम भुस्कुटे

वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ तथा प्राचार्य भवभूती महाविद्यालय आमगाव.

...............................................................................................................

या रोपांना कोरोनामुळे आहे प्रचंड मागणी

तुळस : ही एक सर्वत्र आढळणारी बहुगुणी औषधी वनस्पती आहे. त्यामुळेच आजही प्रत्येकाच्या दारासमोर तुळस लावण्यात येते. तुळशीचा महत्त्वाचा फायदा खोकला, विषदोष, दमा, उचकी लागणे, खवखव होणे तसेच मळमळ होत असल्यास तुळशीच्या पानांचा वापर उपयुक्त ठरतो. तसेच छातीमध्ये जळजळ, वातदोषाचे शमन करण्यासह तुळस दुर्गंधीचा नाश करते. तसेच तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचा महत्त्वाचा गुणधर्मही आहे.

....

अद्रक (आले) : आज घरोघरी प्रत्येकजण चहामध्ये आवर्जून अद्रकचा म्हणजेच आल्याचा वापर करत आहेत. अद्रकमध्ये ॲन्टिफंगल, ॲन्टिसेप्टिक, बायोटिक व्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याबरोबरच विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेदेखील असल्याने आपल्या स्वास्थ्यासाठी कोरोनाकाळात अद्रक महत्त्वाची व मोलाची भूमिका निभावत असल्याने आज आल्याची प्रचंड मागणी बाजारात वाढली आहे. सध्या अद्रकचे दर हे कमी झाले आहेत.

अडुळसा : अडुळसा ही आपल्या परिसरातील एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने उगाळून घेतल्यास त्यापासून जो रस तयार होतो, तो रस काढ्याच्या स्वरूपात घेतल्यास शरीरात अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त असून त्याच्या रोपांची मागणीही सध्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

गुळवेल : गुळवेल या रोपाला अमृता असेही अनेक ठिकाणी संबोधले जाते. अस्थमा व श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीला गुळवेल या रोपाचा प्रचंड फायदा होतो. गुळवेल या रोपाच्या काढ्याचा रस काढला जातो आणि तो काढ्याच्या स्वरूपात प्राशन करण्यास दिला जातो. याचा मानवी आरोग्याला चांगला फायदा होतो.

अश्वगंधा : अश्वगंधामध्ये ॲन्टिऑक्सिडंट आणि ॲन्टिइन्फ्लेमेंटरीचे महत्त्वाचे गुण असतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्येपासून सुटका होते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी आणखीन मजबूत होतात. त्यासोबतच कोलेस्टेरॉलचा खराब स्तरही कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते.