शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

उष्णा तांदळासाठी वाढली छत्तीसगडमध्ये धानाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:55 IST

ताब्यात घेतलेल्या धानाची चौकशी सुरू: महाराष्ट्रातून जातोय मोठ्या प्रमाणात धान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : चार दिवसांपूर्वी देवरी पोलिसांनी देवरी-रायपूर मार्गावरील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावर छत्तीसगड राज्यात जाणारे पाच ट्रक धान ताब्यात घेतले होते. हे धान जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि नवेगावबांध येथील व्यापाऱ्यांचे असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. छत्तीसगड राज्यात उष्णा तांदळासाठी धानाची मोठ्या प्रमाणात मागणी असून, त्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी करून छत्तीसगडमध्ये पाठविला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र, तीन-चार वर्षांपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची काही केंद्र चालकांनी अतिरिक्त दराने छत्तीसगड राज्यात विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. १४ सप्टेंबर रोजी देवरी पोलिसांनी शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावर पाच ट्रक धान ताब्यात घेतले होते. हा धान छत्तीसगड राज्यात जात असल्याचे ट्रकचालकांनी पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांच्याकडे यासंबंधी काही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी हे ट्रक ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.

देवरीचे उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी या धानाची अधिक चौकशी करण्यासाठी व हे शासकीय धान तर नाही ना याची खात्री पटविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला पत्र दिले होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने पडताळणी करून हे शासकीय धान खरेदी केंद्रावरील नसल्याचे पत्र पोलिस विभागाला दिले असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

धान खरेदी बिल, शेष भरल्याची पावती अनिवार्य धानाची खरेदी-विक्री कुठेही करता येते यासाठी कसलेच निर्बंध नाही; पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अथवा दुसऱ्या राज्यात धान पाठविताना त्याचे खरेदी बिल, संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेष भरल्याची पावती तसेच वाहतुकीसाठी लागणारी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. मात्र, देवरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकांकडे ही कागदपत्रे तेव्हा नसल्याची माहिती आहे.

चिचोला बॉर्डरवर सुरु झाले उष्णा प्लांट महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या चिचोला बॉर्डरवर तीन-चार उष्णा तांदळाचे मोठे प्लांट सुरू झाले आहे. या प्लांटला सध्या उष्णा तांदळासाठी मोठ्या प्रमाणात धानाची गरज आहे. त्यामुळे महा- राष्ट्रातून २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने धानाची छत्तीसगड राज्यात विक्री केली जात आहे. पूर्व विदर्भातून दररोज ५० ते ६० ट्रक धान चिचोला येथे जात असल्याची माहिती आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया