शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:07 IST

अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवापर वाढला: विंधन विहिरींचे खोदकाम जोमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहीर खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. कालांतराने आता विहीर खोदण्यासाठी लागणारी मोकळी जागा, विहीर खोदल्यानंतर विहिरीतून निघणारी माती व त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न यातूनच विंधन विहीर खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतो. विंधन विहिरीमधून निघणारे पाणी शुद्ध व आरोग्यास हानीकारक राहत नसल्याने विहिरीस पर्याय म्हणून जिल्ह्यात ठिक-ठिकाणी हातपंप खोदकामास सुरूवात झाली आहे.विहीर उभारण्यासाठी भुपृष्टावर जवळपास ४० ते ६० फुट पर्यंत खोदकाम करावे लागते. मात्र विंधन विहीर खोदण्याकरीता फार अल्पशी जागा लागत असून त्वरीत पाण्याचा उपसा सुरू होतो. हातपंपावर मोटारपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपशा केला जात असल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.पावसाळ्यात पडलेले पाणी विहिरीमध्ये थेट जमा होते. मात्र हात पंपाचे तसे नाही पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी हातपंपात मुरतच नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फूटापर्यंत झिरण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी लागतो तत्पूर्ती जमीनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला असल्याने पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. विहिरीमधील पाणी व हातपंपामधील पाणी उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने सध्या उभारण्यात येणाºया हातपंपासाठी आणखी खोल खोदावे लागत आहे.काही वर्षापूर्वी १५ ते २० फुटावर वाटेल तसे मुबलक पाणी विहिरींना लागत होते. परंतु आता भुगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने विहीर खोदने फार कमी झाले आहे. तसेच हातपंपासाठी ही जास्तीतजास्त खोदावे लागत आहे.या प्रकारावर वेळीच लक्ष दिले नाही तर काही वर्षात या भागात पाण्याकरीता हाहाकार होण्याची चिन्हे आता पासुनच दिसून येत असून उपाययोजनेची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई