शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; आरोप

By admin | Updated: October 27, 2014 22:41 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे

कारंजा (घाडगे) : येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा हेमराज ढोले याने केला. यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गर्दी पांगविण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले. वर्धेतील डॉक्टरांच्या चमूने महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतावस्थेत महिलेवर ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मृतक महिलेच्या मुलाच्या म्हणण्यानुसार २६ आॅक्टोबर रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान छातीत दुखत असल्याने ताराबाई ढोले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णावर उपचार करून गोळ्या व काही औषधी दिली. सकाळी ७.४० वाजताच्या दरम्यान सदर महिला शौचालयाकरिता जाण्याकरिता निघाली. शौचालयाच्या मार्गात पाणी साचुन होते. त्यावर पायघसरल्याने ती खाली पडली. यावेळी कोणीही कर्मचारी हजर नसल्याचा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. यावेळी वॉर्डात असलेल्या रुग्णांनी सदर महिलेला उचलुन खाटेवर टाकले. याची माहिती वैद्यकीय अधिकारी शकील अहमद यांना मिळाली. त्यांनी तिला सलाईन चढवली; परंतु त्यावेळी माझ्या आईचा मृत्यू झाला होता, असे हेमराजचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी मृतकावर उपचार केला. यामुळे नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधीत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकीत्सकाकडे लेखी तक्रार पाठविली व भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घटनास्थळाला भेट देण्याची मागणी केली. शिवाय रुग्णाचे शवविच्छेदन बाहेरील डॉक्टरांनी करावे, अशी मागणी केली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. हा तणाव हाताळण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दुसरीकडे मृतकाच्या मुलाने संबंधीत डॉक्टरवर कारवाई करावी अशी तक्रार कारंजा पोलिसात दिली आहे. कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील कारवाई शवविच्छेदन अहवालानुसार करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.(शहर प्रतिनिधी)