शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; आरोप

By admin | Updated: October 27, 2014 22:41 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे

कारंजा (घाडगे) : येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा हेमराज ढोले याने केला. यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गर्दी पांगविण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले. वर्धेतील डॉक्टरांच्या चमूने महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतावस्थेत महिलेवर ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मृतक महिलेच्या मुलाच्या म्हणण्यानुसार २६ आॅक्टोबर रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान छातीत दुखत असल्याने ताराबाई ढोले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णावर उपचार करून गोळ्या व काही औषधी दिली. सकाळी ७.४० वाजताच्या दरम्यान सदर महिला शौचालयाकरिता जाण्याकरिता निघाली. शौचालयाच्या मार्गात पाणी साचुन होते. त्यावर पायघसरल्याने ती खाली पडली. यावेळी कोणीही कर्मचारी हजर नसल्याचा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. यावेळी वॉर्डात असलेल्या रुग्णांनी सदर महिलेला उचलुन खाटेवर टाकले. याची माहिती वैद्यकीय अधिकारी शकील अहमद यांना मिळाली. त्यांनी तिला सलाईन चढवली; परंतु त्यावेळी माझ्या आईचा मृत्यू झाला होता, असे हेमराजचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी मृतकावर उपचार केला. यामुळे नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधीत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकीत्सकाकडे लेखी तक्रार पाठविली व भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घटनास्थळाला भेट देण्याची मागणी केली. शिवाय रुग्णाचे शवविच्छेदन बाहेरील डॉक्टरांनी करावे, अशी मागणी केली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. हा तणाव हाताळण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दुसरीकडे मृतकाच्या मुलाने संबंधीत डॉक्टरवर कारवाई करावी अशी तक्रार कारंजा पोलिसात दिली आहे. कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील कारवाई शवविच्छेदन अहवालानुसार करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.(शहर प्रतिनिधी)