शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; आरोप

By admin | Updated: October 27, 2014 22:41 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे

कारंजा (घाडगे) : येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा हेमराज ढोले याने केला. यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गर्दी पांगविण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले. वर्धेतील डॉक्टरांच्या चमूने महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतावस्थेत महिलेवर ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मृतक महिलेच्या मुलाच्या म्हणण्यानुसार २६ आॅक्टोबर रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान छातीत दुखत असल्याने ताराबाई ढोले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णावर उपचार करून गोळ्या व काही औषधी दिली. सकाळी ७.४० वाजताच्या दरम्यान सदर महिला शौचालयाकरिता जाण्याकरिता निघाली. शौचालयाच्या मार्गात पाणी साचुन होते. त्यावर पायघसरल्याने ती खाली पडली. यावेळी कोणीही कर्मचारी हजर नसल्याचा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. यावेळी वॉर्डात असलेल्या रुग्णांनी सदर महिलेला उचलुन खाटेवर टाकले. याची माहिती वैद्यकीय अधिकारी शकील अहमद यांना मिळाली. त्यांनी तिला सलाईन चढवली; परंतु त्यावेळी माझ्या आईचा मृत्यू झाला होता, असे हेमराजचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी मृतकावर उपचार केला. यामुळे नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधीत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकीत्सकाकडे लेखी तक्रार पाठविली व भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घटनास्थळाला भेट देण्याची मागणी केली. शिवाय रुग्णाचे शवविच्छेदन बाहेरील डॉक्टरांनी करावे, अशी मागणी केली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. हा तणाव हाताळण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दुसरीकडे मृतकाच्या मुलाने संबंधीत डॉक्टरवर कारवाई करावी अशी तक्रार कारंजा पोलिसात दिली आहे. कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील कारवाई शवविच्छेदन अहवालानुसार करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.(शहर प्रतिनिधी)