शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विवाह संस्कार सोहळ्यातून दिला बेटी बचावचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:34 IST

येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक कुलदीप लांजेवार या तरूणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा कार्य म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला.आजच्या आधुनिक काळात संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेऊन हा विवाह संस्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा होत आहे.

ठळक मुद्देअवास्तव खर्चाला फाटा : पाठ्यपुस्तकांची शाळांना मदत, स्वच्छतादूतांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक कुलदीप लांजेवार या तरूणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा कार्य म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला.आजच्या आधुनिक काळात संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेऊन हा विवाह संस्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा होत आहे.राष्टÑसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या विवाह संस्कार सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा आश्रम मोझरी, जि. अमरावती येथील प्रबोधनकार हभप. लक्ष्मणदास काळे महाराज, राष्टÑसंत विचाराचे ज्येष्ठ अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, राष्टÑीय युवा कीर्तनकार प्रशांत ठाकरे, विजय वाहीकर उपस्थित होते.यावेळी श्री गुरुदेव पद्धतीने देशभक्ती, समाजपयोगी मंगलाष्टकांनी विवाह संस्काराची सुरुवात झाली. सोबतच शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेल्या वºहाड्यांना व राष्टÑसंतानी रचलेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची पुस्तक नवदांपत्याकडून देण्यात आली. विवाह संस्कार सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ व सप्तपदी स्वच्छतेची चा संदेश देणारे बॅचेस लाऊन एका अनोख्या स्वरुपात स्वागत करण्यात आले. विवाह संस्कार सोहळ्याच्या आयोजनात कुठलाही व्यर्थ खर्च न करता कमी खर्चात आदर्श विवाह संस्कार कसा संपन्न होऊ शकतो याचा संदेश देण्यात आला.विवाह संस्कार सोहळ्याचे महत्त्व मान्यवरांकडून मार्गदर्शन करीत अशा विवाह संस्कार सोहळ्याच्या आवश्यकता का? यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या आधुनिक काळात विवाह संस्कारात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदूषण केले जाते शिवाय पैशांचा सुध्दा अपव्यय केला जातो.असा कुठलाही प्रकार या विवाहसोहळ्या दरम्यान करण्यात आला नाही. वर आणि वधुचे पोषाखावर कुठलाही निष्फळ खर्च न करता साध्या भारतीय वेषात विवाह संस्कार सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्यात देवरी स्वच्छता दुतांचा नवदापत्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.भेटवस्तूंच्या स्वरूपात दिली पुस्तकेया विवाह सभारंभात भेटवस्तूच्या स्वरुपात शैक्षणिक साहित्य व पुस्तके देण्याचे आवाहन नवदांपत्याकडून करण्यात आले होते. पाहुण्यांकडून अनेक शैक्षणिक साहित्य, पुस्तके भेटवस्तूच्या स्वरुपात मिळाले. चालू शैक्षणिक वर्षात शाळा व ग्रंथालयांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे. असा आदर्श विवाह संस्कार सोहळ्याचे आयोजन प्रत्येक परिवाराने करुन एक आदर्श समाज घडविण्यासाठी नवदांपत्यांनी सहकार्य केले.वºहाड्यांना सामुदायिक प्रार्थनेचे पुस्तकलग्न सोहळ्यात शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाड्यांना व राष्ट्रसंतानी रचलेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची पुस्तक नवदांपत्याकडून देण्यात आली. विवाह संस्कार सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ व सप्तपदी स्वच्छतेची चा संदेश देणारे बॅचेस लाऊन एका अनोख्या स्वरुपात स्वागत करण्यात आले.असा परिवर्तनवादी विवाह सोहळा कर्मकांड विरहित करण्याचे धाडस या नवदापंत्यांनी दाखवल. कुलदीप लांजेवार तरुणाची कल्पकता, हिम्मत ही निश्चित बोहल्यावर चढणाऱ्या तरुण मित्रांना प्रेरणा देईल. पुन्हा एकदा या क्रांतीकारी सत्कार्याला जयगुरू.- ज्ञानेश्वर रक्षक, प्रवर्तक श्रीगुरूदेव युवामंच.