शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सणवार अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:25 IST

नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.

ठळक मुद्देसंवेदनाहीन पालिका प्रशासन : सहा महिन्यापासून कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजी रोटीसाठी हे कर्मचारी इमानदारीने काम करीत आहे. मात्र त्यांचे मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार देण्यात आले नाही. नगर परिषदेची आर्थिक स्थिती हलाखीची असताना एखाद्यावेळेस पगार मागे-पुढे होणे या कर्मचाऱ्यांनाही मान्य आहे. मात्र पाच-सहा महिने पगार होत नसल्याने कर्मचाºयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.विशेष म्हणजे, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीची नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याची आर्थिक स्थिती नसताना त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार कसे काय देण्यात आले हा मुद्दा देखील उपस्थित केला जात आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ वेतनापेक्षा पाच ते सात हजार रुपये कमी दिले जात असताना एजंसीवर कारवाही करण्याऐवजी नगर परिषदेचे पदाधिकारी व जिल्हा प्रशासन सुध्दा गप्प राहण्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार नसल्याने या कर्मचाऱ्यांवर उधार-उसनवारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. एवढा गंभीर प्रकार नगर परिषदेत घडत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कुणीही काहीच करीत नसल्याने नगर परिषद प्रशासन संवेदनाहिन झाल्याचेही हे कर्मचारी बोलत आहेत. पुढे नवरात्र, रामनवमी व गुढीपाडवा हे सण असून हे सुद्धा अंधारातच दिसून येत आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाहीनगर परिषेदेचे कामकाज चालविण्यासाठी कंत्राटी कर्मचारी काम करीत असताना त्यांच्या पगारासाठी कुणीही काहीच करीत नसल्याचे चित्र आहे. मुख्याधिकारी बेमुदत रजेवर गेले असून त्यांच्या आशिर्वादानेच हे सर्व काही होत असल्याचे कर्मचारी बोलत आहेत. शिवाय पदाधिकारीही डोळे मिटून आहेत. तर दुसरीकडे कंत्राटदार कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कामावरून काढण्याची धमकी देत आहे. अशात मात्र कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाही. मात्र वेळीच यावर तोडगा न काढल्यास हे प्रकरण नगर परिषदेवर शेकण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी घेणार का दखलनगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाबाबत लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह केली होती. मात्र अद्यापही कंत्राटदारावर कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आतातरी जिल्हाधिकारी याची दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका