शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

हवामान विभागाने १० ते १४ जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला असून, १२ व १३ जुलैला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला तर तलाव व बोड्या तुडुंब भरल्या. दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनसुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. तर नदी आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे तीन मार्गांवरील पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. गुरुवारी (दि. १४) पावसाचा जोर ओसरल्याने जिल्हा प्रशासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. प्राथमिक सर्वेक्षणात १५६ घरे आणि गोठ्यांची पडझड झाल्याची बाब पुढे आली आहे. हवामान विभागाने १० ते १४ जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला असून, १२ व १३ जुलैला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला तर तलाव व बोड्या तुडुंब भरल्या. दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनसुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. बुधवारी सर्वाधिक १०२ मिमी पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाली. तर तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातसुद्धा ९५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे तिरोडा-गोंदिया मार्गावरील एकोडी, बोदा-गोमाटोला, पांगोली-शिवनीटोला मार्गावरील नाल्यावरील पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली. मात्र काही तासांसाठी या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील ७५, गोरेगाव २१, गोंदिया १३, अर्जुनी ७, देवरी ३ आणि आमगाव तालुक्यातील ४ अशा एकूण १२३ घरांची पडझड झाली. तर ३१ गोठे कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. महसूल विभागाच्या माध्यमातून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, नुकसानीच्या आकड्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप गुरुवारी देखील कायम होती. 

अनेक कुटुंबे उघड्यावर संततधार पावसामुळे जीर्ण झालेली घरे कोसळल्याने अनेक कुटुंबांना भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. काही कुटुंबांनी गावातील शाळा व समाज मंदिरांचा आसरा घेतला आहे. या कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ देण्याची मागणी केली जात आहे. पावसाचे संकट कायम हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यातच गुरुवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाचे संकट कायम असून, पावसाचा जोर वाढल्यास नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

रोवणी गेली वाहून जिल्ह्यात मागील आठवड्यापासून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. शेतातील बांधांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणीसुद्धा वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखालीच वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर नाल्यांना पूर असून, काही भागात पावसाचा जोर कायम असल्याने गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखालीच असल्याचे चित्र आहे. दोन-तीन दिवस हीच स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर