शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

वादळी पावसाने धानपिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:55 IST

जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज : शेतकºयांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. वादळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड जिल्ह्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शनिवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेकडो हेक्टरमधील धान अक्षरक्ष: झोपल्या गेले. रात्रभर धानाची लोंब पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात दरवर्षी १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यामुळे उर्वरित १ लाख १५ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा कमी पाऊस झाल्यानंतरही शेतकºयांनी कशी बशी धानाची रोवणी करुन पिके जगविण्याचा प्रयत्न केला. महिनाभरानंतर धान कापणीला येणार असतानाच त्याला वादळी पावसाचा फटका बसल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. कमी पाऊस झाला असतानाही शेतकºयांनी रक्ताचे पाणी करुन पिके वाचविली. मात्र त्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. पावसाअभावी आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना अस्मानी संकटाचा फटका सहन करावा लागला. वादळी पावसामुळे सर्वाधिक पिकांचे नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात झाले. या तालुक्यातील ६३७ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मात्र उर्वरित तालुक्यात सुध्दा वादळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले असून ८०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. पालकमंत्री बडोले यांनी देखील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.नुकसान भरपाईची मागणीवादळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करुन आर्थिक मोबदला देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.कीडरोगांचा प्रादुर्भावउष्ण दमट वातारणामुळे धानपिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी हजारो हेक्टरमधील धानपिक धोक्यात आले आहे. कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहेत. मात्र यानंतरही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे.