शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

वादळी पावसाने धानपिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:55 IST

जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज : शेतकºयांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. वादळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड जिल्ह्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शनिवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेकडो हेक्टरमधील धान अक्षरक्ष: झोपल्या गेले. रात्रभर धानाची लोंब पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात दरवर्षी १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यामुळे उर्वरित १ लाख १५ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा कमी पाऊस झाल्यानंतरही शेतकºयांनी कशी बशी धानाची रोवणी करुन पिके जगविण्याचा प्रयत्न केला. महिनाभरानंतर धान कापणीला येणार असतानाच त्याला वादळी पावसाचा फटका बसल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. कमी पाऊस झाला असतानाही शेतकºयांनी रक्ताचे पाणी करुन पिके वाचविली. मात्र त्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. पावसाअभावी आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना अस्मानी संकटाचा फटका सहन करावा लागला. वादळी पावसामुळे सर्वाधिक पिकांचे नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात झाले. या तालुक्यातील ६३७ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मात्र उर्वरित तालुक्यात सुध्दा वादळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले असून ८०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. पालकमंत्री बडोले यांनी देखील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.नुकसान भरपाईची मागणीवादळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करुन आर्थिक मोबदला देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.कीडरोगांचा प्रादुर्भावउष्ण दमट वातारणामुळे धानपिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी हजारो हेक्टरमधील धानपिक धोक्यात आले आहे. कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहेत. मात्र यानंतरही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे.