शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

वादळी पावसाने धानपिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:55 IST

जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज : शेतकºयांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. वादळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड जिल्ह्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शनिवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेकडो हेक्टरमधील धान अक्षरक्ष: झोपल्या गेले. रात्रभर धानाची लोंब पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात दरवर्षी १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यामुळे उर्वरित १ लाख १५ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा कमी पाऊस झाल्यानंतरही शेतकºयांनी कशी बशी धानाची रोवणी करुन पिके जगविण्याचा प्रयत्न केला. महिनाभरानंतर धान कापणीला येणार असतानाच त्याला वादळी पावसाचा फटका बसल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. कमी पाऊस झाला असतानाही शेतकºयांनी रक्ताचे पाणी करुन पिके वाचविली. मात्र त्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. पावसाअभावी आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना अस्मानी संकटाचा फटका सहन करावा लागला. वादळी पावसामुळे सर्वाधिक पिकांचे नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात झाले. या तालुक्यातील ६३७ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मात्र उर्वरित तालुक्यात सुध्दा वादळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले असून ८०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. पालकमंत्री बडोले यांनी देखील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.नुकसान भरपाईची मागणीवादळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करुन आर्थिक मोबदला देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.कीडरोगांचा प्रादुर्भावउष्ण दमट वातारणामुळे धानपिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी हजारो हेक्टरमधील धानपिक धोक्यात आले आहे. कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहेत. मात्र यानंतरही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे.