शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बांध तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 18:15 IST

तलावाचे सपाटीकरण करण्याचा डाव : जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील शासकीय जमिनीवर डोळा ठेवून काहींनी अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. याला प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कारवाईचा अभाव कारणीभूत आहे. परिणामी अतिक्रमणकर्त्यांकडून शहरातील शासकीय जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. असाच प्रकार सूर्याटोला येथे सुरू आहे. येथील बांध तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.

अतिक्रमणकर्त्यांनी तलाव खोदून त्याचे जमिनीत रूपांतर करण्याचा डाव आखून पाऊल टाकले आहे. हा प्रकार सुरू असूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव नेहमीच अतिक्रमणकर्त्यांच्या रडारवर राहिला आहे. तलाव परिसरात यापूर्वीही अतिक्रमण करण्यात आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. येथील रहिवासी असलेले सूर्यवंशी गुरुजी यांनी या अतिक्रमणाविरोधात आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अतिक्रमण काढून बांध तलावाचे सौंदर्गीकरण केले होते. 

यामुळे बांध तलावाचे संरक्षण होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडली. या तलावामुळे परिसरातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत झाली. परंतु, पुन्हा बांध तलावाला ग्रहण लावण्याचे काम सुरू झाले आहे. येथील दोन रहिवाशांनी बांध तलावावर अतिक्रमण करणे सुरू केले. तलावात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करून तलावाच्या पात्राचे सपाटीकरण केले जात आहे. यातून तलाव समतल होऊन जमिनीत रूपांतरित करण्याचा अतिक्रमणकर्त्यांचा डाव आहे. शिवाय या जमिनीवर शेती करण्याच्या उद्देशाने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन 'त्या' अतिक्रमणकर्त्यावर कारवाई करावी, अशी मागणी सूर्याटोला येथील नागरिकांकडून केली जात आहे.

प्रशासन लक्ष देणार का?सूर्याटोला येथील बांध तलावावर नेहमीच अतिक्रमणकर्त्यांचा डोळा राहिला आहे. प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याने अधूनमधून अतिक्रमणाचे प्रकार सुरूच राहतात. आता पुन्हा तलावात अतिक्रमण करून तलावाच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर बांध तलावही सूर्याटोलावा- सीयांच्या आठवणीपुरताच शिल्लक राहील असेच अतिक्रमणकर्त्यांच्या हालचालींवरून दिसत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारसूर्याटोला येथील गट क्र. ३३०/०१ मध्ये बांध तलाव आहे. हा तलाव आदर्श मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था, सूर्याटोलाला मासेमारी- करिता लीजवर दिला आहे. ही संस्था तलावावर मत्स्यबीज संचयन करून मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय करत आहे. परंतु, येथील दोन रहिवाशांनी तलावाच्या मधोमध जेसीबीच्या माध्यमातून सपाटीकरण करून शेती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अतिक्र- मणाच्या या प्रकाराने तलाव धोक्यात आला आहे. आदर्श मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेकडून याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच पं. स.च्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgondiya-acगोंदिया