शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत न करता त्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली.

ठळक मुद्देशासनाने दिले सेवा समाप्तीचे आदेश : दोन हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.पाणी व स्वच्छतेत उत्कृष्ट कामिगरी करणाऱ्या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपासून सेवामुक्त करण्याचे आदेश काढले आहे. या आदेशामुळे या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नये असे शासनाचे धोरण आहे. मात्र शासनाने स्वत:च या धोरणाला हरताळ फासत राज्यातील दोन हजार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश दिल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत न करता त्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. यावर पाणी पुरवठा मंत्र्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी आ.मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे आणि अधिकारी उपस्थित होते. पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म व जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद व तालुक्याच्या पंचायत समितीच्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. आजघडीला त्यांची संख्या सुमारे दोन हजारांच्या घरात आहे.या कर्मचाऱ्यांनी आयुष्याची उमेदीची वर्षेे घालवली, हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेसाठी आटापिटा केला. गुडमॉर्निंग पथकासाठी पहाटेपासून गावोगाव पिंजून काढले, स्वच्छतेबाबत गावस्तरावर स्वच्छता विषयक जनजागृतीचे काम केले. अशा कर्मचाऱ्यांना घरी बसविण्याचा घाट शासनाने घातला आहे. यातील अनेक कर्मचारी वयाची पन्नासी ओलांडलेले आहेत.या सर्व कर्मचाऱ्यांचे संसार आता मोडकळीस येणार आहे.या कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामिगरीच्या बळावर अनेक अधिकाºयांना पदोन्नती प्राप्त झाली. परंतु, ज्यांनी पाणी आणि स्वच्छतेत भरीव काम केले अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवामुक्तीचा बहुमान मिळाल्याने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद