शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

तलावातील बेटांमुळे सारसांचे संवर्धन

By admin | Updated: November 5, 2016 01:22 IST

बोड्या व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे.

तलावातील बेशरम नष्ट : वनालगतच्या तलावांत गाळ पेरणी बंद करागोंदिया : बोड्या व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे. सारसापासून मनूष्य किंवा प्राणी दूर राहावेत यासाठी सारसांचे अधिष्ठाण असलेल्या तलावांच्या मध्यभागी बेट तयार करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. या बेटावर सारसाने अंडी घातल्यास त्या अंडी पर्यंत कुणाला पोहचता येणार नाही. प्राणीही त्यांच्यापर्यंत पोहचणार नाही.गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येतात म्हणजेच गोंदिया जिल्ह्यातील तलावांची स्थिती चांगली आहे. परदेशात बर्फ पडते तेव्हा पक्ष्यांना खाद्य कमी पडते म्हणून ते आपल्या देशात खाद्य शोधण्यासाठी येतात. ज्या बोड्या तलावाता खाद्य मिळते त्यात ते वास्तव्य करतात. आपल्या तलावांमध्ये गाद, खस, चिला, एक्वेटी प्लांटमध्ये मूळाला खोदून खातात. कमलकंद, कमलगट्टे, बोळुंदा हेच खाद्य सारसालाही लागते. स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी सारस येतात. अंडी घालने, बच्चे पालने धानाच्या शेतात करतात. तेव्हा त्यांना किटक, छोटे साप, सरडे पिल्लांना भरवायला मिळतात. त्यामुळे त्या पिल्लांची वाढ होते. शेतातच मालगुजारी तलाव असल्याने या तलवांत असलेल्या बेटाचा फायदा सारसांना होतो. रात्री विश्रांती घेतांना बेटाची फार आवश्यकता असते. कारण बेट असेल तर त्यांना सुरक्षीत वाटते. फिडींग करताना आजूबाजूला कुणी दिसले तर ते बेटाचा वापर करतात. माणूस, वन्यप्राणी यापासूनही सारस आपली अंडी व पिल्लांचा बचाव करतात. परसवाडा तलावावर बेट तयार करण्यात आला. झिलमीली तलावावर बेट तयार करण्यात येणार आहे. तलावात मधल्या भागात एक बेट असावे. नवेगावबांधच्या श्रृंगारबोडीतही बेट केला आहे. इतर सात ते आठ तलावांमध्ये बेट तयार करण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे असे मुकुंद धुर्वे यांनी सांगितले. तलावातील बेशरममुळे अन्न शोधायला पक्ष्यांना कठीण जाते व शिकाऱ्यांना लपायला संधी मिळते. त्यामुळे बेशरमची झाडे काढणे आवश्यक आहे. मानवाच्या हस्तक्षेपाने व अतिक्रमणाने दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी व्हायला लागली. हा मोठा प्रश्न आता पक्षी मित्रांना विचार करायला भाग पाडत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकांनीे आज आहे त्याच परीस्थितीत जतन करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात कृती सुरू असल्याने पुन्हा गतवैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. तलावाच्या आजूबाजूला असलेल्या गावातील काही लोक आर्थिक फायद्यासाठी तलावातून कमळनाल मोठ्या प्रमाणात काढून विकतात. त्यांचा ग्राहक वर्ग वाढल्याने समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच वनस्पती वर अनेक पाणपक्षी आपली घरटी तयार करतात. त्यावर वास्तव्य करणारे अनेक किटक या पाणपक्ष्यांना व त्यांचा पिल्यांना खायला मिळतात. पाण्यावर त्या वनस्पतींच्या पाणाची आच्छादन मिळाल्याने पाणी गरम न होता त्यांना आवश्यक असलेले तापमान कायम राहते. शिकारी पक्ष्यांपासून त्यांच्या पिल्यांचे रक्षण करायला मदत होते. पूर्ण तलावाच्या भागापैकी काही भाग पक्ष्यांसाठी सुरक्षित करून अल्प प्रमाणात लोकांना परवानगी देवून त्या पक्ष्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जवाबदारी सोपविण्याची गरज असते. सारस संवर्धनासाठी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष चेतन बजाज, सचिव अशोक पडोळे, संजय आकरे, उमेंद्र भेलावे व इतर वन्यप्रेमीकडून प्रयत्न केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)