शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात पिकविली धानाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:05 IST

यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हाती आलेले धानपिक गमाविण्याची वेळ आली.

ठळक मुद्देजैविक खतांचा वापर : देवानंदने ठेवला शेतकºयांपुढे आदर्श

हितेश रहांगडाले।ऑनलाईन लोकमत वडेगाव : यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसामुळे बºयाच शेतकºयांना हाती आलेले धानपिक गमाविण्याची वेळ आली. मात्र तिरोडा तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकºयांने कमी पाण्यात आणि दुष्काळी परिस्थितीत धानाचे उत्पादन घेतले. त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आशेचा एक नवा किरण गवसला आहे.दुष्काळी परिस्थितीत धानपिकाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करणाºया शेतकºयाचे नाव देवानंद रंगनाथ बोपचे (४८) रा. बोरगाव (वडेगाव) असे आहे. त्यांनी त्यांच्या केवळ एक एकर शेतीत अल्प पावसात धानपिकाचे उत्पादन घेऊन इतर शेतकºयांपुढे आदर्श ठेवला आहे. यंदाच्या खरीप हंगामात अर्धा अधिक पावसाळा संपल्यानंतर पुढे पाऊस पडण्याची शक्यता कमीच होती.आॅगन्ट महिना उलटत असताना सर्वच शेतकºयांची धानाची रोपे (खारी) उन्हामुळे वाळली. अशा विपरित परिस्थितीत बोपचे यांनी त्यांच्या काही शेतकरी मित्रांच्या सल्ल्यानुसार २३ आॅगस्ट रोजी त्याच्या शेतात ट्रॅक्टच्या सहाय्याने रोटावेटर लावून नांगरणी केली.माती भुसभुसीत झाल्यावर धानाची शेतावर पेरणी करुन आवत्या टाकल्या. त्याने अंतराने पडलेल्या नैसर्गिक पावसाने शेतातील पीक जोमात आले. मजुरांच्या सहाय्याने शेतातील तण काढल्यानंतर धानपिकाची झपाट्याने वाढ झाली. यासाठी त्यांनी कुठलेही रासायनिक खत, औषध व किटकनाशकांचा वापर केला नाही.शेतात आधीपासूनच टाकलेल्या शेणखताने पीक बहरले. सगळीकडे शेतकरी संकटात असताना देवानंदने एक एकर शेतीत १३ पोती धानाचे उत्पादन घेतले. त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगाची जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये चांगलीच चर्चा आहे.शेतकरी मित्रांचा सल्ला पडला उपयोगीदेवानंद बोपचे यांचे काही मित्र जैविक शेती करतात. तसेच ते आवत्या पध्दतीने धानाची लागवड करतात. कमी पावसाचा आवत्या धानावर फारसा परिणाम होत आहे. शिवाय रासायनिक खताऐवजी जैविक खत दिल्याने पिकांची वाढ चांगली होते. शिवाय शेतीच्या लागवड खर्चात सुध्दा बचत करणे शक्य असल्याचा सल्ला देवानंदला दिला. त्यांनी हाच सल्ला आत्मसात करुन यंदा धानाची शेती केली. त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थितीत देखील धानाचे चांगले उत्पादन घेणे शक्य झाले.शेतकऱ्यांनी शेतीच्या लागवड पध्दतीत बदल केल्यास लागवड खर्चात बचत करण्यास मदत होईल. शेतकºयांनी रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढविण्यास निश्चित मदत होईल.- देवानंद बोपचे,प्रयोगशिल शेतकरी