शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देशाला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:23 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते.

ठळक मुद्देमोहित पांडे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते. तर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर गोळीबार करुन भाजप सरकारने देशात जनरल डायर अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे देशाला संघाच्या संविधानाची नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची खरी गरज असल्याचे मत जेएनयुचे विद्यार्थी नेते मोहित पांडे यांनी शुक्रवारी (दि.१३) येथे व्यक्त केले.गोंदिया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.१३) तहसील कार्यालयासमोरील पटागंणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते. या वेळी जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद, यवतमाळचे रमेश जीवने, मिलिंद गणवीर, अनिल रामटेके, निलेश देशभ्रतार उपस्थित होते. पांडे म्हणाले, ग्रामीण भागातील वंचित मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी बाबासाहेबांनी जेएनयुसारखे शैक्षणिक केंद्र असावे अशी त्यांची विचारधारा होती. मात्र आज बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्र ांतीलाच लगाम लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला. शिक्षणाची दारेच बंद करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत असल्याची टिका केली. जेएनयुमधील शिक्षणाच्या सुविधा बंद करु न गरीब सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाला लगाम लावण्याचे काम जोमात सुरु झाले आहे. तर दुसरीकडे मन की बात सांगून लोकांना दिशाभूल करणारे प्रधानसेवक मात्र त्यांच्या डोळ्यासमोर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या विसरले आहेत. शैक्षणिक अत्याचारात रोहीतची हत्या करून आंतक निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे. अल्पसंख्याक, दलित व महिला हे एकत्र येऊ नये, अशी विचारधारा असलेली संघटना नागपूरात आहे. ती म्हणजे आरएसएस होय.नाथुरामच्या समोरील राम हटवू शकले नाही पण बाबासाहेबांच्या नावात राम लावायला चालणारे हे लोक देशात शुद्र अतिशुद्राचे राजकारण करित आहेत. आपला आवाज बुलंद करण्यासाठी मुक्या असलेल्या संसदेसमोर काही बोलून होणार नाही, तर त्यासाठी रस्त्यावर उतरु न लढाई लढावी लागणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे राष्ट्रविरोधी - शेहला रशीददेशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे. सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही. तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते. काश्मिरात हिंदू एकतेचे नावाने भाजपची जी शाखा काम करीत आहे, तीचे काम बघून भाजपा नव्हे तर भारत जलाव पार्टी असल्याची घणाघाती टिका जवाहरलाल जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केली.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती