शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

देशाला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:23 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते.

ठळक मुद्देमोहित पांडे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते. तर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर गोळीबार करुन भाजप सरकारने देशात जनरल डायर अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे देशाला संघाच्या संविधानाची नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची खरी गरज असल्याचे मत जेएनयुचे विद्यार्थी नेते मोहित पांडे यांनी शुक्रवारी (दि.१३) येथे व्यक्त केले.गोंदिया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.१३) तहसील कार्यालयासमोरील पटागंणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते. या वेळी जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद, यवतमाळचे रमेश जीवने, मिलिंद गणवीर, अनिल रामटेके, निलेश देशभ्रतार उपस्थित होते. पांडे म्हणाले, ग्रामीण भागातील वंचित मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी बाबासाहेबांनी जेएनयुसारखे शैक्षणिक केंद्र असावे अशी त्यांची विचारधारा होती. मात्र आज बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्र ांतीलाच लगाम लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला. शिक्षणाची दारेच बंद करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत असल्याची टिका केली. जेएनयुमधील शिक्षणाच्या सुविधा बंद करु न गरीब सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाला लगाम लावण्याचे काम जोमात सुरु झाले आहे. तर दुसरीकडे मन की बात सांगून लोकांना दिशाभूल करणारे प्रधानसेवक मात्र त्यांच्या डोळ्यासमोर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या विसरले आहेत. शैक्षणिक अत्याचारात रोहीतची हत्या करून आंतक निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे. अल्पसंख्याक, दलित व महिला हे एकत्र येऊ नये, अशी विचारधारा असलेली संघटना नागपूरात आहे. ती म्हणजे आरएसएस होय.नाथुरामच्या समोरील राम हटवू शकले नाही पण बाबासाहेबांच्या नावात राम लावायला चालणारे हे लोक देशात शुद्र अतिशुद्राचे राजकारण करित आहेत. आपला आवाज बुलंद करण्यासाठी मुक्या असलेल्या संसदेसमोर काही बोलून होणार नाही, तर त्यासाठी रस्त्यावर उतरु न लढाई लढावी लागणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे राष्ट्रविरोधी - शेहला रशीददेशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे. सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही. तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते. काश्मिरात हिंदू एकतेचे नावाने भाजपची जी शाखा काम करीत आहे, तीचे काम बघून भाजपा नव्हे तर भारत जलाव पार्टी असल्याची घणाघाती टिका जवाहरलाल जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केली.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती