शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

देशाला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:23 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते.

ठळक मुद्देमोहित पांडे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते. तर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर गोळीबार करुन भाजप सरकारने देशात जनरल डायर अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे देशाला संघाच्या संविधानाची नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची खरी गरज असल्याचे मत जेएनयुचे विद्यार्थी नेते मोहित पांडे यांनी शुक्रवारी (दि.१३) येथे व्यक्त केले.गोंदिया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.१३) तहसील कार्यालयासमोरील पटागंणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते. या वेळी जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद, यवतमाळचे रमेश जीवने, मिलिंद गणवीर, अनिल रामटेके, निलेश देशभ्रतार उपस्थित होते. पांडे म्हणाले, ग्रामीण भागातील वंचित मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी बाबासाहेबांनी जेएनयुसारखे शैक्षणिक केंद्र असावे अशी त्यांची विचारधारा होती. मात्र आज बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्र ांतीलाच लगाम लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला. शिक्षणाची दारेच बंद करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत असल्याची टिका केली. जेएनयुमधील शिक्षणाच्या सुविधा बंद करु न गरीब सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाला लगाम लावण्याचे काम जोमात सुरु झाले आहे. तर दुसरीकडे मन की बात सांगून लोकांना दिशाभूल करणारे प्रधानसेवक मात्र त्यांच्या डोळ्यासमोर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या विसरले आहेत. शैक्षणिक अत्याचारात रोहीतची हत्या करून आंतक निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे. अल्पसंख्याक, दलित व महिला हे एकत्र येऊ नये, अशी विचारधारा असलेली संघटना नागपूरात आहे. ती म्हणजे आरएसएस होय.नाथुरामच्या समोरील राम हटवू शकले नाही पण बाबासाहेबांच्या नावात राम लावायला चालणारे हे लोक देशात शुद्र अतिशुद्राचे राजकारण करित आहेत. आपला आवाज बुलंद करण्यासाठी मुक्या असलेल्या संसदेसमोर काही बोलून होणार नाही, तर त्यासाठी रस्त्यावर उतरु न लढाई लढावी लागणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे राष्ट्रविरोधी - शेहला रशीददेशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे. सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही. तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते. काश्मिरात हिंदू एकतेचे नावाने भाजपची जी शाखा काम करीत आहे, तीचे काम बघून भाजपा नव्हे तर भारत जलाव पार्टी असल्याची घणाघाती टिका जवाहरलाल जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केली.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती