शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
5
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
6
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
7
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
8
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
9
कंबर, मान, खांद्यामध्ये असह्य वेदना; दुर्मिळ आजारामुळे १२ किलोने वाढला स्तनांचा आकार
10
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
11
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
12
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
13
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
14
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
15
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
16
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
17
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
18
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
19
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
20
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!

कोरोनाची पावले आता ग्रामीण भागाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा हळूहळू वाढू लागला असून आता ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा हळूहळू वाढू लागला असून आता ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाने आपली पावले शहरासह ग्रामीण भागाकडे वळविल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागात कोराेनाचा संसर्ग वाढणे जिल्हावासीयांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून कोरोनाला जिल्ह्यात हद्दपार करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (दि. २३) ४८ कोरोना बाधितांची नोंद झाली तर १५ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ४८ बाधितांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २, आमगाव ४, सालेकसा ४, देवरी २, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि इतर राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया, अर्जुनी मोरगाव, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुकावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ९६,२६६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८३,८८१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ८२,२२६ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७५,८०३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५,१९२ कोरोना बाधित आढळले त्यापैकी १४,४७५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ५३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ११५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६७ टक्के

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच १५ दिवसांच्या कालावधीत कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३० वर पोहोचली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६७ टक्के असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तर मृत्यू दर १.२० टक्के आहे.

............

प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे होतेय दुर्लक्ष

कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे.