शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कोरोनाने दिली मातीचे ॠण फेडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

तालुक्यातील ग्राम हिरापुर येथील पाच, ग्राम सटवा येथील एक, ग्राम दवडीपार येथील पाच व ग्राम पुरगाव येथील सहा असे एकूण २२ माजी विद्यार्थी कुणी शिक्षणासाठी, कुणी मजुरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी परराज्यातून आपापल्या घरी परतले आहेत. नियमानुसार त्या सर्वांना त्यांच्या गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देक्वारंटाईन युवकांकडून सफाई अभियान : माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो. ज्या शाळेच्या मातीत खेळलोे आणि आयुष्याची बेरीज वजाबाकी शिकलो. त्या शाळेचे आणि गावच्या मातीचे ॠण फेडण्याची हिच वेळ आहे. हे शब्द आहेत गावातील माजी विद्यार्थ्यांचे. हे २२ माजी विद्यार्थी कोरोनामुळे गावाकडे परतले असून सर्वांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या काळात त्यांनी आपापल्या गावातील शाळांमध्ये सफाई करून शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे.तालुक्यातील ग्राम हिरापुर येथील पाच, ग्राम सटवा येथील एक, ग्राम दवडीपार येथील पाच व ग्राम पुरगाव येथील सहा असे एकूण २२ माजी विद्यार्थी कुणी शिक्षणासाठी, कुणी मजुरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी परराज्यातून आपापल्या घरी परतले आहेत.नियमानुसार त्या सर्वांना त्यांच्या गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे शासनाचे आदेश असल्याने या काळात शाळेसाठी काही तरी विशेष केले पाहिजे ही भावना या माजी विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच दरम्यान शाळा सफाई अभियानाला त्यांनी सुरूवात केली.वर्षभर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शाळेची सफाई व झाडांचे संगोपण करतात. मात्र सुटीत शाळेची दुरवस्था होत असून झाडे मरून जातात. मात्र यंदा सुट्यांमध्येच कोरोनाने डोके वर काढले व नशिबाने क्वारंटाईन करण्यात आलेल्या या माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठी काही तरी करण्याची संधी मिळाली. या माजी विद्यार्थ्यांनी शालेय परीसरातील स्वच्छता, झाडांना पाणी देणे, झाडांची कटिंग करणे, कचरा काढणे ही सर्व कामे हाती घेतली आणि शाळेचा चेहरामोहराच बदलवून टाकला आहे.झाडांना दररोज पाणी मिळत असल्याने झाडे ही डोलू लागली आहेत. त्यामुळे गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटल्याचे चित्र बघायला मिळत आहे.यावे ज्ञानासाठी... निघावे सेवेसाठीज्या शाळेत बालपण गेले. त्या मंतरलेल्या दिवसाची आठवण येते. शहराच्या झगमगाटीत गावातील वैभवाचा विसर पडला होता. कोरोना ने सर्व काही शिकविले. बालपणी ज्ञानासाठी आलो होतो आता नशिबाने शाळेच्या सेवेसाठी उपलब्ध आहो.-एक माजी विद्यार्थी, पुरगाव-------------------हिरापूर येथील ५ माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत स्वमर्जीने शालेय परीसरातील झाडांना पाणी देणे व स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे .- भुपेश गौतमउपसरपंच, हिरापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा