शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

कोरोना पावला; आठवीपर्यंतचे १.५३ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी पास ...

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी पास करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ वी च्या १ लाख ५३ हजार ४४ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच पास करावे लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यात वर्ग पहिलीत मुले ७४७७, तर मुली ७०८८ असे १४ हजार ५४५ विद्यार्थी, वर्ग दुसरा मुले ९६२४ तर मुली ८९१८ असे १८ हजार ५४२ विद्यार्थी, तिसऱ्या वर्गातील मुले १०४६३ तर मुली ९७१३ असे २० हजार १७६ विद्यार्थी, चवथी मुले १०५३७ तर मुली ९८६९ असे २० हजार ४०६ विद्यार्थी, पाचवी मुले १०१०१ तर मुली ९५५८ असे १९ हजार ६६४ विद्यार्थी, सहावी मुले १००३८ तर मुली ९४०२ असे १९ हजार ४४० विद्यार्थी, सातवी मुले १००६२ तर मुली ९५८८ असे १९ हजार ६५० विद्यार्थी, आठवी मुले १०४७५ तर मुली १०१२६ असे २० हजार ६०१ विद्यार्थी आहेत. अभ्यास न करता पुढच्या वर्गात जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, कोरोनामुळे आपला पाल्य मागे पडत आहे, याची चिंता पालकांना जास्तच सतावत आहे.

......

जिल्ह्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली---१४५६५

दुसरी--१८५४२

तिसरी---२०१७६

चौथी--- २०४०६

पाचवी--१९६६४

सहावी--१९४४०

सातवी--१९६५०

आठवी--२०६०१

...........

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...

कोट

सध्या कोरोना परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे.

- मिलिंद रंगारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया.

.....

कोट

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही. त्यांना शाळेतही बोलावता येणार नाही. अशात घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.

-किशोर बावणकर, शिक्षक, जि.प. शाळा, आपकारीटोला.

....................

कोट पालक

कोरोनामुळे सरकारने वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात पास करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे; परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही; परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

- सुनील बोहरे, पालक, शिवणटोला

----

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र, त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील; पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी पालकांचा आग्रह आहे.

- सचिन हुमे, पालक, आसोली.

........

शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही सरकारने आरटीई कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा पास केले जाणार आहे.

-अर्चना चिंचाळकर, पालक, विद्यानगरी, आमगाव.