शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

कोरोना पावला; आठवीपर्यंतचे १.५३ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी पास ...

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी पास करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ वी च्या १ लाख ५३ हजार ४४ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच पास करावे लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यात वर्ग पहिलीत मुले ७४७७, तर मुली ७०८८ असे १४ हजार ५४५ विद्यार्थी, वर्ग दुसरा मुले ९६२४ तर मुली ८९१८ असे १८ हजार ५४२ विद्यार्थी, तिसऱ्या वर्गातील मुले १०४६३ तर मुली ९७१३ असे २० हजार १७६ विद्यार्थी, चवथी मुले १०५३७ तर मुली ९८६९ असे २० हजार ४०६ विद्यार्थी, पाचवी मुले १०१०१ तर मुली ९५५८ असे १९ हजार ६६४ विद्यार्थी, सहावी मुले १००३८ तर मुली ९४०२ असे १९ हजार ४४० विद्यार्थी, सातवी मुले १००६२ तर मुली ९५८८ असे १९ हजार ६५० विद्यार्थी, आठवी मुले १०४७५ तर मुली १०१२६ असे २० हजार ६०१ विद्यार्थी आहेत. अभ्यास न करता पुढच्या वर्गात जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, कोरोनामुळे आपला पाल्य मागे पडत आहे, याची चिंता पालकांना जास्तच सतावत आहे.

......

जिल्ह्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली---१४५६५

दुसरी--१८५४२

तिसरी---२०१७६

चौथी--- २०४०६

पाचवी--१९६६४

सहावी--१९४४०

सातवी--१९६५०

आठवी--२०६०१

...........

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...

कोट

सध्या कोरोना परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे.

- मिलिंद रंगारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया.

.....

कोट

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही. त्यांना शाळेतही बोलावता येणार नाही. अशात घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.

-किशोर बावणकर, शिक्षक, जि.प. शाळा, आपकारीटोला.

....................

कोट पालक

कोरोनामुळे सरकारने वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात पास करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे; परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही; परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

- सुनील बोहरे, पालक, शिवणटोला

----

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र, त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील; पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी पालकांचा आग्रह आहे.

- सचिन हुमे, पालक, आसोली.

........

शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही सरकारने आरटीई कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा पास केले जाणार आहे.

-अर्चना चिंचाळकर, पालक, विद्यानगरी, आमगाव.