शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

वणव्यांवर वेळीच आणणार नियंत्रण

By admin | Updated: March 11, 2015 01:22 IST

उन्हाळ्यात वनांत आग लागण्याचे प्रकार अधिक घडतात. वणव्याचे कारण नैसर्गिक कमी, मात्र मानवी कृतीच अधिक कारणीभूत असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकमत विशेषदेवानंद शहारे गोंदियाउन्हाळ्यात वनांत आग लागण्याचे प्रकार अधिक घडतात. वणव्याचे कारण नैसर्गिक कमी, मात्र मानवी कृतीच अधिक कारणीभूत असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वनातील अग्निमुळे जीवंत वृक्षांचा कोळसा होतो. शिवाय वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येतो. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन आणि वन्यजीव विभाग आता सज्ज झाला असून, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी आग विझविणारी ५१ यंत्रे उपलब्ध झाली आहेत.वनांत आगीने पेट घेताच सर्व्हे आॅफ इंडियाकडून अलर्ट सॅटेलाईटने मॉनिटरिंग होते व त्याद्वारे माहिती मिळते. शिवाय वायरलेस यंत्रणा २४ तास सुरू राहते. २८ आग निरीक्षण करणारे मनोरे उभारण्यात आली असून त्यावर २४ तास वॉकीटॉकीसह निरीक्षण करणारी माणसे उपलब्ध आहेत. त्यामुळे वनांत आग लागल्याची माहिती त्वरित दिली जाते. गाईड्सकडूनही तशी माहिती दिली जाते. या प्रकारात वनाच्या आतपेक्षा बाहेरील आगच अधिक असते. यानंतर संबंधित विभागाकडून उपलब्ध असलेल्या आग विझविणाऱ्या मशिन्सद्वारे वनवा आटोक्यात आणला जातो. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी आग विझविणारी एकूण ५१ यंत्र सध्यस्थितीत उपलब्ध आहेत. यात नागझिरा अभयारण्यासाठी नऊ यंत्रे, उमरझरी येथे सहा यंत्रे, डोंगरगाव येथे सहा यंत्रे, पिटेझरी येथे सहा यंत्रे, नवेगावबांध पार्क येथे नऊ यंत्रे, कोका अभयारण्यासाठी आठ यंत्रे, कोकाच्या फिरत्या पथकासाठी एक व गोंदियाच्या फिरत्या पथकासाठी एक अशा ५१ यंत्रांचा समावेश आहे.वणवे आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने काही साधन सामग्री तयार ठेवली आहे. त्यात फायर ब्लोवर्स ४५, मोबाईल (स्मार्ट फोन/पीडीए ५, प्रोटेक्शन हट्स ५४, वॉच टॉवर्स (निरीक्षण मनोरे) २६, कॉटन डागरी ८५, कॉटन हँड ग्लोज ८५, जंगल शूज ४५, फायर फायटिंग टूल ३०, वॉकीटॉकी ४६, वायरलेस स्टेशन १७ आदींचा समावेश आहे.