शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

८५ टक्के इमारतींचे बांधकाम अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:43 IST

शहरात रस्त्यालगत होत असलेल्या इमारतींच्या बांधकामामुळे रस्ते अरुंद होत आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणाने समस्येत वाढ : नगररचना विभागावर प्रश्न चिन्ह, नगर परिषद करणार सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात रस्त्यालगत होत असलेल्या इमारतींच्या बांधकामामुळे रस्ते अरुंद होत आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची ओरड कायम असतानाच शहरातील ८५ टक्के इमारतींचे बांधकाम अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे शहरवासीय त्रस्त आहेत. त्यासंदर्भातील तक्रारींमध्ये वाढ होत आहे. शहरात खासगी व अथवा व्यावसायीक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद नगररचना विभागाची परवानगी आवश्यक आहे. इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी नगररचना विभागाची परवानगी आवश्यक आहे. त्या शिवाय बांधकाम करता येत नाही. बांधकामाच्या नकाशाला मंजूरी दिल्यानंतर त्यानुसार बांधकाम करण्यात आले अथवा नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी देखील याच विभागाची आहे. मात्र नगररचना विभाग केवळ इमारत बांधकामाच्या नकाशांना मंजूरी देऊन मोकळा होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकाम होत असल्याचे चित्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १ लाख ३२ हजार होती. त्यामध्ये गेल्या सहा ते सात वर्षांत आणखी भर पडली आहे. नगररचना विभागाच्या अहवालानुसार शहरात सध्यास्थितीत ७० हजारावर इमारती आहेत. यापैकी ८५ टक्के इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशानुसार करण्यात आलेले नाही. याची कबुली स्वत: नगर परिषदेच्या एका जबाबदार अधिकाºयांने दिली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरातील अनाधिकृत इमारतींच्या बांधकामाला टाच लावण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लवकरच सर्वेक्षणाला सुरूवात केली जाणार आहे. त्यानंतर नकाशानुसार नसलेले अतिरिक्त बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती आहे.मालमत्ता कर वसुलीवर परिणामशहरात इमारतींचे बांधकाम करताना नगररचना विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र काहीजण परवानगी घेत नाहीत. तर काहीजण मंजुरी घेतलेल्या नकाशापेक्षा अधिक बांधकाम करतात. परिणामी मालमत्ता कर आकारणीवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे वर्षाकाठी लाखो रुपयांचा कर बुडत असल्याचे चित्र आहे.अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडीवाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील रस्ते अरुंद होत आहे. परिणामी मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते. वाहनचालक आणि पायी जाणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.तक्रारींमध्ये वाढअनाधिकृत बांधकामामुळे शेजाºया शेजाºयांमध्ये वाद होत आहे. यासंबंधीच्या तक्रारींमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला केवळ नगररचना विभाग जबाबदार असल्याचा आरोप शहरवासीयांचा आहे.नगररचना आणि मालमत्ताकर आकारणी विभागाच्या मदतीने शहरात लवकरच इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येईल. मंजूर नकाशानुसार बांधकाम नसलेल्या इमारतींवर कारवाई केली जाईल.- चंदन पाटील,मुख्याधिकारी नगर परिषद.