शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार ११२ रस्ते सभागृहांचे बांधकाम

By admin | Updated: April 24, 2015 01:39 IST

प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले.

नवेगावबांध : प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले. त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले हे विकासकामांना गती देतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती. यानुरूप पालकमंत्री बडोले यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी सुचविलेल्या कामांना ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती ना.बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.जिल्ह्यात २५/१५ या लेखा शिर्षांतर्गत ४.५ कोटींच्या निधीतून जवळपास ११२ विकासांची कामे होणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४० विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होणे हे गरजेचे असते. यानुरूप जिल्ह्यातील आमदार व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्य शासनाकडे अनेक विकासातामक कामे सुचविली होती. याबाबत पालकमंत्री बडोले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. २५/१५ या लेखा शिर्षकाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ११२ रस्ते व सभागृहाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने शासन निर्णय निर्गमित करून दिली आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात गोरेगाव तालुक्यातील पाटेकुर्रा, सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमघाट, कोसमतोंडी, खोडशिवनी, फुटाळा, राका, मुंडीपार, चिखली, डोंगरगाव, डव्वा, पुतळी, चिंगी, कोहमारा, कोदामेढी, खुर्शीपार, तिडका, पांढरवाणी, पांढरी, परसोडी, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताळगाव, बोरी, तिडका, देवलगाव, निमगाव, भरनोली, राजोली, धाबेटेकडी, गवर्रा, बाक्टी, दाभना, देऊळगाव, गौरनगर, सिलेझरी, बोंडगाव, कोरंभीटोला, खामखुर्रा, इटखेडा, वडेगाव-रेल्वे व धाबेटेकडी-आदर्श या गावांसह देवरी तालुक्यातील ५८ लाखांची १७ कामे, आमगाव तालुक्यात १८ लाखांची ७ कामे, सालेकसा तालुक्यात २४ लाखांची ८ कामे, तिरोडा तालुक्यात ४६ लाखांची १५, गोरेगाव तालुक्यात ३० लाखांची ११ कामे व गोंदिया तालुक्यात ७१ लाखांची १४ कामे मंजूर झाली आहेत. ना. बडोले यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे. (वार्ताहर)