शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

२९०० उमेद कर्मचाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST

गोंदिया : महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यात सुरू असलेल्या उमेद अभियानातील २९०० कर्मचाऱ्यांना २६ ऑगस्ट २०२० च्या शासन परिपत्रकानुसार ...

गोंदिया : महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यात सुरू असलेल्या उमेद अभियानातील २९०० कर्मचाऱ्यांना २६ ऑगस्ट २०२० च्या शासन परिपत्रकानुसार सीएसीकडून नियुक्ती देण्यात यावी असा परस्पर निर्णय घेण्यात आला होता. या परिपत्रकानुसार उमेद अभियानातील २९०० कर्मचाऱ्यांना सीएससीमार्फत नियुक्ती न देता अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्वीप्रमाणेच उमेद अभियानामार्फतच देण्यात येतील असे पत्र देण्यात आल्याने राज्यातील या २९०० उमेद कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीएससीमार्फत नियुक्तीचा निर्णय रद्द करावा यासाठी राज्यातील उमेद, महाराष्ट्र महिला कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्यावतीने निवेदन देऊन ३४ जिल्ह्यांमध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. हा निर्णय रद्द व्हावा यासाठी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे, आ. हरी राठोड, अर्चना शहा यांनी मध्यस्थी करून निर्णय रद्द करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मंत्री अब्दुल सतार, खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेद कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून सीएसी निर्णय रद्द करण्यात आला. या निवेदनात उमेद अभिनायात कार्यरत समूह संसाधन व्यक्ती महिलांच्या मानधन वाढीची मागणी करण्यात आली आहे. परंतु या मागणीसंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही.