शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनागरिकांत अपघाताची भीती : जीव मुठीत घेऊन रहदारी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतात रोवणीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करतानाच चिखलाने माखलेले ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.लाखांदूर तालुक्यातील विशेषत: चौरास भागात धानपीक रोवणीला वेग आला आहे. धान रोवणीसाठी चिखलणी साठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करतात.शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाऱ्या चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव परिसरातील नागरिकांना रहदारीदरम्यान सहन करावा लागत असतो.या सबंध गैरप्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनासह बांधकाम विभाग व वाहतूक नियंत्रण विभागाला असली तरी संबंधितांकडून हेतूपुरस्पर डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही नागरिकांफर्ते केला जात आहे.चिखलमय रस्ते होताना वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन गावांचा संपर्क तुटल्याने चौरसातील जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतातून ट्रॅक्टरने चिखल माती सह रस्त्यावर येणाºया वाहन चालका विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.चिखलणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चिखल मातीने भरलेल्या अवस्थेतच रस्त्यावर काढले जात असल्याने ट्रॅक्टरच्या चाकांना असलेले चिखल माती रस्त्यावर पडून पावसात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. साधारण पावसात या भागातील रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनाने ये-जा करणे धोकादायक ठरत असल्याने चिखलमय रस्त्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा