शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुणाच्या जाण्याने काँग्रेस कमजोर होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रथमच पुढे येत शहीद भोला काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, पी.जी.कटरे,पृथ्वीपालसिंग गुलाटी, योगेंद्र कटरे,आलोक मोहंती, हरिष तुळस्कर उपस्थित होते.

ठळक मुद्देपुरूषोत्तम कटरे : पक्ष सोडून जाणाऱ्यांचा निष्कासित करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आ. गोपालदास अग्रवाल हे काँग्रेस पक्ष सोडून गेल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष दुबळा झाला,पक्षाकडे नेतृत्त्वाचा अभाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सर्व चर्चा निर्धार असून कुणा एकाच्या जाण्याने काँग्रेस पक्ष कधीच कमजोर होणार नाही. जिल्ह्यात काँग्रेस विचारधारेच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असून ही पक्षाची मोठी तिजोरी आणि ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जोमाने कामाला लागणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रथमच पुढे येत शहीद भोला काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, पी.जी.कटरे,पृथ्वीपालसिंग गुलाटी, योगेंद्र कटरे,आलोक मोहंती, हरिष तुळस्कर उपस्थित होते.पुरूषोत्तम कटरे म्हणाले आ.अग्रवाल यांच्यासह जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे,शहरध्यक्ष अशोक चौधरी,तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्यासह पाच जि.प.आणि तीन पं.स.सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून निष्कासीत करण्याचा प्रस्ताव जिल्हा काँग्रेसच्या कोअर कमिटीने प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविला आहे.त्यांच्यावर निष्कासीत करण्याची कारवाई शुक्रवारनंतर होणार आहे.तर पुन्हा कोणते पदाधिकारी भाजपमध्ये गेले याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून हा संभ्रम दूर करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी लवकरच गावागावात जातील. काँग्रेसचे पदाधिकारी हे आजपर्यंत केवळ काँग्रेसच्या विचारधारेमुळेच आ.अग्रवाल यांच्यासोबत होते.आता त्यांच्या आणि आमचे मार्ग वेगळे आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्रातून दमदार उमेदवार देऊन काँग्रेस पक्ष या क्षेत्रात निश्चितच बळकट केला जाईल. तसेच कार्यकर्ते हे आ.अग्रवाल यांच्यासोबत नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत होते असे सांगितले.गोंदिया काँग्रेसकडे?गोंदिया विधानसभा क्षेत्र हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा पांरपारिक मतदारसंघ राहिला आहे.त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असणार आहे.गोंदिया आणि आमगाव काँग्रेस तर अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहणार असल्याचे पुरूषोत्तम कटरे यांनी सांगितले.गुरूवारी उमेदवाराची घोषणागोंदिया विधानसभा क्षेत्रातून उमेदवारीसाठी पूर्वी अमर वऱ्हाडे,विजय बहेकार यांची नावे पाठविण्यात आली होती. मात्र मंगळवारी पुरुषोत्तम कटरे आणि पी.जी.कटरे यांची नावे कोअर कमिटीकडून पाठविण्यात आली. गुरूवारी सायंकाळी अधिकृत उमेदवाराची घोषणा होणार असल्याचे विनोद जैन यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल