शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे पाकिस्तानचे समर्थनपत्र, मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 22:24 IST

या मुद्द्यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला.

गोंदिया : काँग्रेसने जाहीर केलेले घोषणापत्र म्हणजे अतिरेक्यांचे समर्थन करणाऱ्या आणि अतिरेकी कारवायांना खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे समर्थनपत्रच असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील मरारटोली येथील मैदानावर आयोजित जाहीरसभेत केली. या मुद्द्यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला.आपल्या ३२ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी काँग्रेसच्या घोषणापत्राचा तब्बल दहा मिनिटे खरपूस समाचार घेतला. देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी प्रामाणिकपणे सांगावे की देशाशी विभागणी करण्याचा कट रचू पाहणा-या काँग्रेसचे त्यांना खरच समर्थन करावे काय याचे उत्तर त्यांनी जनतेल दिलेले बरे, देश विघात कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू नये, अशी भूमिका घेणा-या पक्षाचे तुम्ही समर्थन करता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला.सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट येथील अतिरेक्यांच्या कॅम्पवर हल्ला करून भारताला कमजोर समजण्याचे धाडस कुणीही करू नये असा इशारा या कारवाईतून पाकिस्तानला दिल्याचे मोदी यांनी आवर्जून सांगितले. मात्र भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-या लोकांना जनता या निवडणुकीतून नक्कीच धडा शिकवेल, असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सरकारने गेल्या ७० वर्षांत विकासाची तिजोरी रिकामी करून जे खड्डे तयार केले ते भरण्याचे काम आपण मागील पाच वर्षांत केले आहे. आता पुढील पाच वर्षांत विकासाचा हायवे तयार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. ही निवडणूक आपण लढत नसून देशातील नागरिक लढवित असल्याचा पुनरुच्चार त्यांनी गोंदिया येथील सभेत केला.यंदाच्या निवडणुकीत महायुती महाराष्ट्रातून महामिलावटवाल्या आघाडीचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे गोंदियातील सभेने दाखवून दिले आहे. देशात फोफावत असलेल्या नक्षलवादावर बोलताना मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील माओवाद्याचे दिवस आता भरले आहेत. परंतु या देशाची धुरा जर अतिरेक्यांचे समर्थन करणा-यांच्या हाती दिली तर पुन्हा सामान्य नागरिकांच्या जीवावर उठेल. त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडा-यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत, खा. डॉ. विकास महात्मे, आ.परिणय फुके, अनिल सोले, विजय रहांगडाले, बाळा काशिवार, संजय पुराम , माजी खा.खुशाल बोपचे, प्रदीप पडोळे, उमेदवार सुनील मेंढे, माजी आ.केशव मानकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गिरीश व्यास, उपेंद्र कोठेकर, माजी मंत्री गौरीशंकर बिसेन, माजी.खा.शिशुपाल पटले, खा.बोधसिंह भगत, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते...............कप्तानानंतर उपकप्तानाची ही माघारलोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कप्तानाने माघार घेतली तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणातून उपकप्तानाने माघार घेतली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली. ते म्हणाले धान उत्पादकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे काम महाराष्ट्रतील भाजप सेना युती सरकारने अतिशय प्राणाणिकपणे केले आहे. सिंचन प्रकल्पांसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील नझुल पट्टेधारकांचा विषय असो की धानाला ५०० रुपये बोनस देण्याचे काम असो असे अनेक जनहिताचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. आघाडी शासनाच्या कारर्किदीत जेवढी धान खरेदी झाली नाही, त्याहून पाचपट अधिक धान खरेदी युती सरकारच्या काळात झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक