शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर किसान व मजूर बचाव दिवस पाळत या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकरी बचाओ, कृषी विधेयक रद्द, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक घेवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देडफली वाजवून केला केंद्र सरकारचा निषेध : कृषी विधेयक रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी विषयक विधेयक पारित केले आहे. हे विधेयक शेतकरी आणि शेतमजूर विरोधी असून ते रद्द करण्यात यावे या मागणीला घेवून जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी (दि.२) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी डफली वाजवून नोंदविला.शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर किसान व मजूर बचाव दिवस पाळत या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकरी बचाओ, कृषी विधेयक रद्द, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक घेवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. त्यानंतर फुलचूर चौकातून बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा जयस्तंभ चौकातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा डफली वाजवून निषेध नोंदविला. या मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, विनोद जैन, जितेश राणे यांनी केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन राष्टपतींच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवा दल, ओबीसी विभाग, अनु.जाती विभाग, असंघटित मजदूर काँग्रेस, युथ काँग्रेस, एनएसयुआयचे कार्यकर्ते व नीलम हलमारे, सुर्यप्रकाश भगत, डॉ.संजीव ठकरेले, सुशील खरकाटे, प्रशांत लिल्हारे, नटवरलाल गांधी, विजेंद्र बरोडे, अमित भालेराव, जीवन शरणागत, चंद्रशेखर बगडे, प्रभा उपराडे, वंदना काळे,अजय रहांगडाले,अमर राहुल, ममता पाऊलझगडे, आलोक मोहंती यांनी सहकार्य केले.या आहेत प्रमुख मागण्याकेंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कृषी विधेयक रद्द करा.शेतकरी व शेतकरी विरोधी विधेयके श्रमिक विरोधी विधेयक रद्द करा.एअर इंडिया, एल.आय.सी, बँकासह सार्वजनिक उपक्रम विकण्यास विरोध.हाथरस येथील पीडितेला न्याय देण्यात यावा.शेतकरी आणि सर्वसामान्य विरोधी धोरणे केंद्र सरकारने मागे घ्यावीत.

टॅग्स :congressकाँग्रेसMorchaमोर्चा