शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

१० महिन्यांपासून संगणक परिचालक वेतनापासून वंचित

By admin | Updated: May 11, 2014 00:28 IST

तालुक्यातील ई-ग्रामपंचायत प्रणालीमध्ये काम करणार्‍या बोंडगाव/सुरबन, दिनकरनगर, सिरोली/महागाव व देवलगाव या चार ग्रामपंचायतमधील संगणक ....

अर्जुनी/मोरगाव : तालुक्यातील ई-ग्रामपंचायत प्रणालीमध्ये काम करणार्‍या बोंडगाव/सुरबन, दिनकरनगर, सिरोली/महागाव व देवलगाव या चार ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांचे रुजू झाल्यापासून १० महिन्यांचे मानधन अद्यापपर्यंत देण्यात आले नाही. याबद्दल विचारणा केली असता पंचायत समितीचे अधिकारी व महाआॅनलाईन कंपनीचे अधिकारी संगणक परिचालकांना काम न केल्यास कामावरून काढून देण्याची दमदाटी देत आहेत. आपल्यावरील अन्याय दूर व्हावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व खंडविकास अधिकारी यांच्याकडे संगणक परिचालकांनी निवेदन सादर केले आहे. राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्रामपंचायत सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर २०११ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणक चालविण्यासाठी संगणक परिचालक हे पद अस्तित्वात आणले आहे. संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या १३ व्या वित्त आयोगातून प्रतिमाह ८,८२४ रुपये मानधन देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामुळे पाच ते आठ हजारापर्यंतच्या नोकर्‍यासोडून आपल्याच गावात आपण रोजगार करावा, या आशेने अनेकांनी संगणक परिचालकांनी काम स्वीकारले आहेत. यासाठी १३ व्या वित्त आयोगातून संगणक परिचालकांचे ८,८२४ रुपये मानधन काढून १२ वी पास असलेल्यांना ३८०० रुपये तर पदवी धारकांना ४,१०० रुपये दिले जातात. तर उर्वरित रक्कम कंत्राट दिलेल्या कंपनीसोबत संगनमत करून संगणक परिचालकांच्या ताळूवरील लोणी खान्याचा सुल्तानशाही काम शासन व अधिकारी तसेच महाआॅनलाईन कंपनीने सुरू केले आहे. मात्र वास्तविक परिस्थिती याहून वेगळीच आहे. तालुक्यातील बोंडगाव/सुरबन, दिनकरनगर, सिरोली/महागाव व देवलगाव या चार ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांचे गेल्या दहा महिन्यांपासून मानधन दिलेच नाही. मानधनाविषयी विचारणा केल्यास काम करायचे असेल तर करा, अन्यथा कामावरून काढून देऊ. अशी दमदाटी देण्यात येते. यावरून लोकशाही आहे की दंडुकेशाही? हे समजणे पलीकडचे आहे. देशात वाढत असलेली बेरोजगारी यामध्येही उच्च शिक्षिताना काम मिळणे कठीण असताना अल्पशा मानधनावर काम करीत आहेत. मात्र मागील १० महिन्यांपासून काम करणार्‍या संगणक परिचालकांवर अन्यायच केला जात आहे. कोणत्याही संदर्भात विचारणा केली असता पंचायत समिती व महाआॅनलाईनचे अधिकारी उद्धट भाषेत उत्तर देतात. सद्यस्थितीत ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे त्याचप्रमाणे कार्यालयीन कामांचा व्याप मोेठ्या प्रमाणात आहे. बहुतेक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नाही. असे असतानाही संगणक परिचालकांकडून योग्यप्रकारे काम चालविले जाते. मात्र त्यांना देण्यात येणार्‍या मानधनासंदर्भात त्यांच्यावर अन्याय केला जातो. यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. आपल्यावरील अन्याय दूर व्हावा, यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व अर्जुनी/मोरगाव पं.स.चे खंडविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. वरिष्ठ काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)