शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:05 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत बंदचा प्रभावकाही व्यापाऱ्यांचे समर्थन नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव बघता येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूला रविवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. यात रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत जनता कर्फ्यूला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मात्र सोमवारी (दि.१४) काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून आम्ही सोबत नसल्याचे दाखवून दिले. तरिही बाजारपेठेत संमिश्र जनता कर्फ्यू दिसून आला.जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे. तर दररोज मृतांची संख्याही वाढत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रूग्ण संख्या वाढ होत असून एकूण रूग्णांच्या ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले आहेत. एकंदर शहराची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. अशात वेळीच यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. यासाठी बाजारपेठ मध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे असून यासाठीच बाजारपेठेतील काही व्यापाºयांनी पुढाकार अन्य घेत अन्य व्यापाºयांचे समर्थन घेऊन रविवारपासून (दि.१३) जनता कर्फ्यू केला आहे.

रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत या जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळाला व कडकडीत बंद दिसून आला. मात्र सोमवारी (दि.१४) बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून जनता कर्फ्यूला समर्थन नसल्याचे दाखवून दिले. परिणामी सोमवारी बाजारपेठेतही जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळून आल्याचे दिसले. यात दुकान उघडणाऱ्यांचे अत्यंत कमी होते व त्यामुळे चांगलाच बंद दिसून आला. कोरोनाचा वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी व्यापारी एकमेकांना सोबत घेऊन आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी बंदचे आवाहन करीत आहेत, हे विशेष.शहरातील अन्य भागात प्रतिसाद नाहीचबाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूला कित्येक व्यापारी संघटनांनी आपले समर्थन दिले आहे. त्यानुसार, बाजारपेठेत कडकडीत बंद ही दिसून येत आहे. मात्र शहरातील अन्य भागांमध्ये नजर टाकल्यास व्यापारी जनता कर्फ्यूच्या समर्थनात नसल्याचे दिसत आहे. शहरातील अन्य भागात नेहमीप्रमाणेच दुकानी सुरू असल्याचे दिसले. यावरून हा जनता कर्फ्यू फक्त बाजारपेठ पुरताच मर्यादीत असल्या सारखे वाटले.बाजारात गर्दी घटलीबाजारपेठ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून कोरोनाला आपले पसरण्यासाठी हेच वातावरण पोषण ठरते. त्याचा फटकाही जिल्हा व शहरवासी चांगलाच झेलत आहेत. गर्दी नियंत्रणात आल्यास कोरोनाची साखळी तुटून नक्कीच रूग्ण संख्या घटणार असा विश्वास बाजारातील व्यापाऱ्यांना आहे. त्यांच्या या जनता कर्फ्यूच्या २ दिवसांत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसले. यामुळे त्यांच्या बंदचे नक्कीच चांगले परिणाम येतील असे म्हणता येईल.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस