शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:05 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत बंदचा प्रभावकाही व्यापाऱ्यांचे समर्थन नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव बघता येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूला रविवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. यात रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत जनता कर्फ्यूला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मात्र सोमवारी (दि.१४) काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून आम्ही सोबत नसल्याचे दाखवून दिले. तरिही बाजारपेठेत संमिश्र जनता कर्फ्यू दिसून आला.जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे. तर दररोज मृतांची संख्याही वाढत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रूग्ण संख्या वाढ होत असून एकूण रूग्णांच्या ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले आहेत. एकंदर शहराची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. अशात वेळीच यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. यासाठी बाजारपेठ मध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे असून यासाठीच बाजारपेठेतील काही व्यापाºयांनी पुढाकार अन्य घेत अन्य व्यापाºयांचे समर्थन घेऊन रविवारपासून (दि.१३) जनता कर्फ्यू केला आहे.

रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत या जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळाला व कडकडीत बंद दिसून आला. मात्र सोमवारी (दि.१४) बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून जनता कर्फ्यूला समर्थन नसल्याचे दाखवून दिले. परिणामी सोमवारी बाजारपेठेतही जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळून आल्याचे दिसले. यात दुकान उघडणाऱ्यांचे अत्यंत कमी होते व त्यामुळे चांगलाच बंद दिसून आला. कोरोनाचा वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी व्यापारी एकमेकांना सोबत घेऊन आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी बंदचे आवाहन करीत आहेत, हे विशेष.शहरातील अन्य भागात प्रतिसाद नाहीचबाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूला कित्येक व्यापारी संघटनांनी आपले समर्थन दिले आहे. त्यानुसार, बाजारपेठेत कडकडीत बंद ही दिसून येत आहे. मात्र शहरातील अन्य भागांमध्ये नजर टाकल्यास व्यापारी जनता कर्फ्यूच्या समर्थनात नसल्याचे दिसत आहे. शहरातील अन्य भागात नेहमीप्रमाणेच दुकानी सुरू असल्याचे दिसले. यावरून हा जनता कर्फ्यू फक्त बाजारपेठ पुरताच मर्यादीत असल्या सारखे वाटले.बाजारात गर्दी घटलीबाजारपेठ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून कोरोनाला आपले पसरण्यासाठी हेच वातावरण पोषण ठरते. त्याचा फटकाही जिल्हा व शहरवासी चांगलाच झेलत आहेत. गर्दी नियंत्रणात आल्यास कोरोनाची साखळी तुटून नक्कीच रूग्ण संख्या घटणार असा विश्वास बाजारातील व्यापाऱ्यांना आहे. त्यांच्या या जनता कर्फ्यूच्या २ दिवसांत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसले. यामुळे त्यांच्या बंदचे नक्कीच चांगले परिणाम येतील असे म्हणता येईल.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस