शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:05 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत बंदचा प्रभावकाही व्यापाऱ्यांचे समर्थन नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव बघता येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूला रविवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. यात रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत जनता कर्फ्यूला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मात्र सोमवारी (दि.१४) काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून आम्ही सोबत नसल्याचे दाखवून दिले. तरिही बाजारपेठेत संमिश्र जनता कर्फ्यू दिसून आला.जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे. तर दररोज मृतांची संख्याही वाढत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रूग्ण संख्या वाढ होत असून एकूण रूग्णांच्या ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले आहेत. एकंदर शहराची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. अशात वेळीच यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. यासाठी बाजारपेठ मध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे असून यासाठीच बाजारपेठेतील काही व्यापाºयांनी पुढाकार अन्य घेत अन्य व्यापाºयांचे समर्थन घेऊन रविवारपासून (दि.१३) जनता कर्फ्यू केला आहे.

रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत या जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळाला व कडकडीत बंद दिसून आला. मात्र सोमवारी (दि.१४) बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून जनता कर्फ्यूला समर्थन नसल्याचे दाखवून दिले. परिणामी सोमवारी बाजारपेठेतही जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळून आल्याचे दिसले. यात दुकान उघडणाऱ्यांचे अत्यंत कमी होते व त्यामुळे चांगलाच बंद दिसून आला. कोरोनाचा वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी व्यापारी एकमेकांना सोबत घेऊन आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी बंदचे आवाहन करीत आहेत, हे विशेष.शहरातील अन्य भागात प्रतिसाद नाहीचबाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूला कित्येक व्यापारी संघटनांनी आपले समर्थन दिले आहे. त्यानुसार, बाजारपेठेत कडकडीत बंद ही दिसून येत आहे. मात्र शहरातील अन्य भागांमध्ये नजर टाकल्यास व्यापारी जनता कर्फ्यूच्या समर्थनात नसल्याचे दिसत आहे. शहरातील अन्य भागात नेहमीप्रमाणेच दुकानी सुरू असल्याचे दिसले. यावरून हा जनता कर्फ्यू फक्त बाजारपेठ पुरताच मर्यादीत असल्या सारखे वाटले.बाजारात गर्दी घटलीबाजारपेठ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून कोरोनाला आपले पसरण्यासाठी हेच वातावरण पोषण ठरते. त्याचा फटकाही जिल्हा व शहरवासी चांगलाच झेलत आहेत. गर्दी नियंत्रणात आल्यास कोरोनाची साखळी तुटून नक्कीच रूग्ण संख्या घटणार असा विश्वास बाजारातील व्यापाऱ्यांना आहे. त्यांच्या या जनता कर्फ्यूच्या २ दिवसांत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसले. यामुळे त्यांच्या बंदचे नक्कीच चांगले परिणाम येतील असे म्हणता येईल.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस