शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन समितीने केली मुख्याध्यापिकेची तक्रार

By admin | Updated: October 25, 2014 01:33 IST

ककोडी येथील जि.प. हायस्कूलमध्ये सन २०१२ पासून रेखा ठवरे या मुख्याध्यापिका आहेत.

गोंदिया : ककोडी येथील जि.प. हायस्कूलमध्ये सन २०१२ पासून रेखा ठवरे या मुख्याध्यापिका आहेत. त्या दोन वर्षापासून शाळेच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारात कसूर करीत आहेत. तसेच त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेचे आयोजनही केले नाही. या आशयाची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच जि.प. चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना केली आहे.शाळा व्यवस्थापन समितीची सभा न घेणे व शाळेच्या आर्थिक तसेच प्रशासकीय व्यवहारात कसूर करणे याबाबत मुख्याध्यापिका रेखा ठवरे यांची तक्रार आठ महिन्यांपूर्वी व्यवस्थापन समितीच्याच पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या वतीने अद्यापही चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे शाळेच्या आर्थिक व प्रशासकीय कार्यांवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सदर मुख्याध्यापिका व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वत:च्याच मनमर्जीने कार्यभार सांभाळत आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोणत्याच प्रकारची सभा घेतली नाही. मात्र आता चौकशी होणार आहे म्हणून त्यांनी सदस्यांच्या घरी जावून सह्या घेतल्या. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याकरिता एप्रिल महिन्यात जि.प.चे अधिकारी आले होते. त्यांच्या समोर समितीच्या लोकांचे बयान नोंदविण्यात आले. परंतु चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा मुख्याध्यापिकेची चौकशी करण्यात आली नाही. शाळेमध्ये चार शिक्षक व एक चपराशीचे पद रिक्त आहेत. त्यासाठी समितीच्या माध्यमातून ठराव पाठविणे अपेक्षित होते. परंतु सदर मुख्याध्यापिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे मोठेच नुकसान होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची एकही सभा न घेणे, शाळेमध्ये व्हिजित बुक नसणे, विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षा शुल्क वाटप न करणे, शिष्यवृत्ती वाटप न करणे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अनुदान योग्य मार्गी न लावणे आदी आक्षेप समितीने मुख्याध्यापिकेवर घेतले आहेत. तसेच यावर्षी साहित्य खरेदीसाठी शाळेला एक लाख २० हजार रूपये मिळाले होते. परंतु मुख्याध्यापिकेच्या निष्काळजीपणामुळे सदर रक्कम परत गेली. या सर्व बाबींवरून संबंधित मुख्याध्यापिका प्रशासकीय व आर्थिक कार्य सांभाळण्यासाठी अयोग्य आहे. त्यामुळे त्यांचा कार्यभार काढण्यात यावा, अन्यथा समितीचे पदाधिकारी व गावकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)