शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नुकसानभरपाई द्या, अन्यथा मलाच खड्ड्यात पुरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST

गोंदिया : बर्ड फ्लूच्या नावावर निंबा येथील श्रुतीज ब्राॅयलर या फार्ममधील ८ हजार ६६२ कोंबड्या खड्ड्यात पुरण्याचे आदेश जिल्हाधिकारी ...

गोंदिया : बर्ड फ्लूच्या नावावर निंबा येथील श्रुतीज ब्राॅयलर या फार्ममधील ८ हजार ६६२ कोंबड्या खड्ड्यात पुरण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. त्याची नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा मलाच खड्ड्यात पुरा, अशा इशारा शेतकरी शशांक रामचंद्र डोये यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.

निंबा येथून एक किमी अंतरावर बर्ड फ्लूने एका कावळ्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तो अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेने दिल्यानंतर निंबा येथील श्रुतीज ब्रायलर या फार्ममधील कोंबड्या खड्ड्यात पुरण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले होते. त्यांच्या आदेशावरून ८ हजार ६६२ जिवंत कोंबड्या खड्ड्यात पुरण्यात आल्या. त्या कोंबड्यांचे प्रति नग सरासरी वजन १ किलो ९०० ग्रॅम एवढे होते. त्यांना लागलेला दाणा, व्हॅक्सिन, चुना, कोंडा, मजुरी, इलेक्ट्रिक, औषध आदी असा प्रतिपक्षी १४० रुपये याप्रमाणे १२ लाख १२ हजार ६८० रुपये तसेच आपल्या आदेशानुसार तीन महिने फार्म बंद ठेवणे यांचा मजूर, इलेक्ट्रिक खर्च, फार्मचे पडदे, कोंडा आदी सामान नष्ट करण्यात आले. त्याचा पूर्ण खर्च अंदाजे २ लाख ५० हजार रुपये एवढे नुकसान झाले. याप्रकरणी १४ लाख ६२ हजार ६८० रुपयांचे नुकसान झाले आहे. माझ्या संपूर्ण कोबड्यांचा खर्च व आमच्या सामानांची नुकसानभरपाई, इलेक्ट्रिक बिल आणि पुनश्च फार्म सुरू करण्याच्या आदेशापर्यंत लागणारा खर्च देण्यात यावा, हा निर्णय १५ दिवसांच्या आत घेण्यात यावा, अन्यथा स्वत:ला संपवण्याशिवाय माझ्या जवळ दुसरा कुठलाही मार्ग नाही. हे सर्व शक्य नसल्यास मलासुध्दा खड्ड्यात पुरून माती टाकण्याचे आदेश देण्यात यावे, असा इशारा श्रुतीज ब्रायलर फार्मचे संचालक शेतकरी शशांक रामचंद्र डोये यांनी जिल्हाधिकारी यांना ८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

बॉक्स

पाहणी न करताच दिले मारण्याचे आदेश

श्रुतीज ब्रायलर या फार्ममध्ये बर्ड फ्लूने मरतूक नव्हती. नेहमीप्रमाणे १३ ते १४ टक्के मरतूक ३६ दिवसांत होती. ही मरतूक नेहमीच असते; परंतु फक्त भोपाळच्या रिपोर्टवरून जिवंत पक्षी पुरण्यात आले. या पोल्ट्रीची पुनश्च तपासणी करण्याकरिता प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता लक्ष न देता लगेच पक्षी पुरण्याचे आदेश देण्यात आले हा माझ्यावरील अन्याय असल्याचे शशांक डोये म्हणाले.