शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

त्या २८ गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देलोकमत्तच्या वृत्ताची दखल : विनोद अग्रवाल यांना विधानसभेत मांडला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावांसह गोंदिया तालुक्यातील २८ गावांना फटका बसला होता. त्यात गोंदिया तालुक्यातील एकूण ४३१४ शेतकऱ्यांचे १८२७ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ७५८ हेक्टरमधील पिकांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही कसलाही मोबदला मिळाला नव्हता. लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. आ.विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत लोकमतमधील वृत्ताचे कात्रण दाखवून हा मुद्या लावून धरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.सन २०१७ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. उर्वरित ७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून सुद्धा त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागले.या ७ हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार की नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.मागील कर्जमाफीत अर्ज पात्र ठरून सुद्धा कर्जमाफी न मिळालेल्या शेतकºयांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत या योजनेचा लाभ देण्याची मागणी आ. अग्रवाल यांनी केली.गोदामांची व्यवस्था करायावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले असून धान विक्रसाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. मार्केटिंग फेडरेशन जवळपास ३० लाख क्विंटल धान खरेदी करणार असून आत्तापर्यंत २६ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्केटिंग फेडरेशनकडे ३ लाख क्विंटल धान साठवण करण्याची क्षमता आहे. परिणामी पंधरा पंधरा दिवस धानाची उचल होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उघड्यावरील धानाला पाऊस आणि गारपिटीचा सुध्दा फटका बसला. शासनाने धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था करावी अशी मागणी सभागृहात आ. विनोद अग्रवाल यांनी केली.सुधारित वीज बिलाचे वाटप कराजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वापरापेक्षा अतिरिक्त बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून शेतकºयांना विज बिलात दुरूस्ती करुन नवीन बिल वाटप करण्याची मागणी केली.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी