शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

जिल्ह्यात संचारबंदी कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात दुकाने बंद : थोड्याफार प्रमाणात वर्दळ दिसली, आता नागरिकांच्या सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतरही राज्यातील कित्येक जिल्ह्यांत सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन करण्यात आले. याची दखल घेत जिल्ह्यातही नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी बंद ठेवल्याचे दिसले. परिणामी सोमवारीही (दि.२३) जिल्ह्यात संचारबंदी कायम दिसली.देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनावरून प्रसंगाचे गांभीर्य बघत देशवासीयांना रविवारी (दि.२२) कडकडीत बंद पाळून ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद दिला.रविवारच्या या ‘जनता कर्फ्यू’ नंतरही रूग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेत शासनाने देशातील कित्येक राज्यांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार, महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी केले जात असल्याचे बघत जिल्हावासीयांनीही स्वेच्छेने प्रतिसाद देत सोमवारी (दि.२३) ‘जनता कर्फ्यू’ पाळला. यांतर्गत नागरिकांनी सकाळपासूनच घराबाहेर निघणे टाळत घरीच राहण्यास पसंती दर्शविली. शिवाय व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या आपत्तीत आपला सहभाग नोंदविला. सोमवारी (दि.२३) जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हेच चित्र दिसून आले. तर तुरळक प्रमाणात नागरिक घराबाहेर दिसून आले.जिल्ह्यातील ६२८ जण निगरानीखालीकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर कोरोनामुळे विदेशात वास्तव्यास असणारे अनेकजण स्वगृही परतत आहे. सोमवारपर्यंत (दि.२३) विदेशातून एकूण १२१ जण जिल्ह्यात परतले आहेत. यासर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ५०८ अशा ६२८ जणांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगरानीखाली आहेत.बाहेरील देशातून कामानिमीत्त देशात येणाºयांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुद्धा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात परतणाºया नागरिकांची नोंदणी केली जात आहे. त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.विदेशात असलेले १२१ जण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची ५ जणांना लक्षणे दिसली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या ५ जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकही संशयीत किंवा बाधीत रूग्ण नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या