शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
4
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
5
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
6
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
7
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
8
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
9
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
10
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
11
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
12
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
13
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
14
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
15
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
16
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
17
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
18
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
19
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
20
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संचारबंदी कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात दुकाने बंद : थोड्याफार प्रमाणात वर्दळ दिसली, आता नागरिकांच्या सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतरही राज्यातील कित्येक जिल्ह्यांत सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन करण्यात आले. याची दखल घेत जिल्ह्यातही नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी बंद ठेवल्याचे दिसले. परिणामी सोमवारीही (दि.२३) जिल्ह्यात संचारबंदी कायम दिसली.देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनावरून प्रसंगाचे गांभीर्य बघत देशवासीयांना रविवारी (दि.२२) कडकडीत बंद पाळून ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद दिला.रविवारच्या या ‘जनता कर्फ्यू’ नंतरही रूग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेत शासनाने देशातील कित्येक राज्यांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार, महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी केले जात असल्याचे बघत जिल्हावासीयांनीही स्वेच्छेने प्रतिसाद देत सोमवारी (दि.२३) ‘जनता कर्फ्यू’ पाळला. यांतर्गत नागरिकांनी सकाळपासूनच घराबाहेर निघणे टाळत घरीच राहण्यास पसंती दर्शविली. शिवाय व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या आपत्तीत आपला सहभाग नोंदविला. सोमवारी (दि.२३) जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हेच चित्र दिसून आले. तर तुरळक प्रमाणात नागरिक घराबाहेर दिसून आले.जिल्ह्यातील ६२८ जण निगरानीखालीकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर कोरोनामुळे विदेशात वास्तव्यास असणारे अनेकजण स्वगृही परतत आहे. सोमवारपर्यंत (दि.२३) विदेशातून एकूण १२१ जण जिल्ह्यात परतले आहेत. यासर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ५०८ अशा ६२८ जणांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगरानीखाली आहेत.बाहेरील देशातून कामानिमीत्त देशात येणाºयांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुद्धा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात परतणाºया नागरिकांची नोंदणी केली जात आहे. त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.विदेशात असलेले १२१ जण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची ५ जणांना लक्षणे दिसली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या ५ जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकही संशयीत किंवा बाधीत रूग्ण नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या