शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासह मानव विकास वाढविण्यासाठी कटिबद्ध

By admin | Updated: May 2, 2016 01:49 IST

जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून जैवविविधता व वन्यजीवसृष्टी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा

गोंदिया : जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून जैवविविधता व वन्यजीवसृष्टी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन स्थानिकांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी होईल याचे नियोजन करण्यात येत असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी किटबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. रविवारी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानात मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री बडोले बोलत होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जि.प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी. कटरे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर प्रामुख्याने उपस्थिते होते. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष राज्यात आदर भावनेने साजरे करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले लंडन येथील घर राज्य शासनाने खरेदी करु न त्याचे जागतिक पातळीवरील स्मारकात रुपांतर केले. इंदू मिलच्या जागेवर लवकरच डॉ.आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. नागपूरच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वर्ष वरु न ६० वर्ष करण्यात आली आहे. बार्टीच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख व स्वावलंबी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील भिमघाट, कोरनीघाट, कालीमाटी व बुद्धभूमीच्या विकासासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. तेंदूपाने संकलनातून जिल्ह्यातील ४५ हजार मजूरांना वनावर आधारित रोजगार मिळाल्याचे सांगून बडोले यांनी, अभयारण्य व वनालगतच्या गावातील १४ हजार १९७ कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्यामुळे त्यांचे वनांवर असलेले अवलंबित्व कमी झाले आहे. महाराजस्व अभियानातून महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक झाल्याचे त्यांनी सांगितले. मामा तलावात रोहयोतून मत्स्यबीज संगोपन व संवर्धन तळ््यांचे बांधकाम करणार असल्याचे सांगीतले. तर जिल्ह्यातील गोरगरीब रु ग्णांना चांगली व मोफत सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत, क्षयरु ग्ण विभागात लावण्यात आलेली सीबी नेट ही महागडी मशिन क्षयरुग्णांसाठी वरदान ठरली आहे. ४६४४ रु ग्णांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे. ४ ते २५ मे दरम्यान लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त रु ग्णांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. तसेच जिल्ह्यातील ५१४४ शेतक ऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले ५ कोटी ८८ लक्ष रुपये कर्ज शासनाने माफ केल्याचे त्यांनी सांगितले. परेडचे संचलन परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले. यावेळी पेलीस विभागाचे पुरु ष व महिला दल, गृहरक्षक पुरु ष व महिला दल, शीघ्र कृती दल, श्वान पथकाने पथसंचलन करु न राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. अग्नीशमन, रु ग्णवाहीकांनी परेडमध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन करून आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार ४यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने तालुक्यातील तलाठी आर.एस.बोडखे यांना सन्मानीत करण्यात आले. पुरस्कारादाखल मिळालेली रक्कम बोडखे यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी पालकमंत्र्यांना दिली. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल पोलीस उपनिरिक्षक अविनाश गडाख, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पेटकुले, रमेश येळे, पोलीस हवालदार शेखर सोनवाने, उमेश इंगळे, वामन पारधी, राधेश्याम गाते, प्रकाश डुंबरे, वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी रामारेड्डी जिहाटावार, राजा भिवगडे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट स्काऊट-गाईड म्हणून अंशुक उगदे, मुन्नालाल बागडे, विकास झिंगरे, पंकज रहांगडाले, पुनम रामटेके, निकिता कटरे या विद्यार्थ्यांचा तर येथील उड्डाणपुलावरील अपघातातील युवकांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करु न त्यांचे प्राण वाचिवल्याबद्दल कुशल अग्रवाल यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मागेल त्याला शेततळे या योजनेचा कार्यारंभ आदेश प्रकाश पटले (मजीतपूर), जगन्नाथ रेवतकर (खर्रा), संतोष गायधने (गंगाझरी), सुरजलाल भगत (धामनीवाडा), देवानंद रहांगडाले (खातीटोला) या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.