शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

येत्या वर्षभरात धम्मकुटीला मोठे स्वरुप यावे- बडोले

By admin | Updated: May 17, 2014 23:45 IST

भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाने प्रेरीत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला बुद्ध धर्म दिला. बुद्धाच्या मार्गाचे आचरण करुन समाज दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.

नवेगावबांध : भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाने प्रेरीत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला बुद्ध धर्म दिला. बुद्धाच्या मार्गाचे आचरण करुन समाज दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे आवश्यक आहे. त्यात कालीमाती धम्मकुटी हे सर्वांनाच प्रेरणा देणारे स्थान आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला सर्वच उपासकांनी धम्मकुटीला भेट द्यावी. प्रत्येकाच्याच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्याने येणार्‍या पाच वर्षात धम्मकुटीला मोठे स्वरुप यायला पाहिजे असे मत आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते धम्मकुटी काळीमाती (ता. अर्जुनी/मोर) येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित धम्म सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र ठवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नदीप दहिवले, दयाराम भालाधरे, गोठणगावचे सरपंच जनार्धन टेंभुर्णे, जि.प. सदस्य किरण कांबळे, पत्रकार विजय डोये, किशोर शंभरकर, नवलकिशोर चांडक, के.आर. उके, इंजि. यशवंत गणवीर, डॉ. अजय अंबादे, विलास बनसोड, सरपंच व्यंकट खोब्रागडे, दिनेश खोब्रागडे, डॉ. दिपक उके, राहुल रामटेके, प्रदीप गणविर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम आ. बडोले यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे व सुरेंद्र ठवरे यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर स्थापीत बुद्धमुर्तीचे पूजन व वंदना ग्रहण करण्यात आली. पुष्पगुच्छांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दहिवले म्हणाले की, दु:खाचं खरं कारण बुद्धाने शोधून काढले. जोपर्यंत मन:शांती होणार नाही तोपर्यंत दु:ख नष्ट होत नाही. नकारात्मकता हा मानवाचा मोठा शत्रू आहे. शांती, बंधुभाव व प्रेमानेच मनातील नकारात्मकता लोप पावत असते. विविध प्रकारच्या कार्यक्रमातून धम्मकुटीचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक उपासकाचे कर्तव्य आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त होणार्‍या धम्मसोहळ्याला प्रत्येकाने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयाराम भालाधरे यांनी मांडले. संचालन पी.एन. जगझापे यांनी केले. आभार डॉ. अजय अंबादे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया, समता सैनिक दल, अर्जुनी/मोर, सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील बौद्ध बांधवांनी सहकार्य घेतले. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजनदास व धम्मरसाचे वाटप देखील करण्यात आले. (वार्ताहर)