शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

येत्या वर्षभरात धम्मकुटीला मोठे स्वरुप यावे- बडोले

By admin | Updated: May 17, 2014 23:45 IST

भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाने प्रेरीत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला बुद्ध धर्म दिला. बुद्धाच्या मार्गाचे आचरण करुन समाज दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.

नवेगावबांध : भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाने प्रेरीत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला बुद्ध धर्म दिला. बुद्धाच्या मार्गाचे आचरण करुन समाज दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे आवश्यक आहे. त्यात कालीमाती धम्मकुटी हे सर्वांनाच प्रेरणा देणारे स्थान आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला सर्वच उपासकांनी धम्मकुटीला भेट द्यावी. प्रत्येकाच्याच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्याने येणार्‍या पाच वर्षात धम्मकुटीला मोठे स्वरुप यायला पाहिजे असे मत आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते धम्मकुटी काळीमाती (ता. अर्जुनी/मोर) येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित धम्म सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र ठवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नदीप दहिवले, दयाराम भालाधरे, गोठणगावचे सरपंच जनार्धन टेंभुर्णे, जि.प. सदस्य किरण कांबळे, पत्रकार विजय डोये, किशोर शंभरकर, नवलकिशोर चांडक, के.आर. उके, इंजि. यशवंत गणवीर, डॉ. अजय अंबादे, विलास बनसोड, सरपंच व्यंकट खोब्रागडे, दिनेश खोब्रागडे, डॉ. दिपक उके, राहुल रामटेके, प्रदीप गणविर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम आ. बडोले यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे व सुरेंद्र ठवरे यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर स्थापीत बुद्धमुर्तीचे पूजन व वंदना ग्रहण करण्यात आली. पुष्पगुच्छांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दहिवले म्हणाले की, दु:खाचं खरं कारण बुद्धाने शोधून काढले. जोपर्यंत मन:शांती होणार नाही तोपर्यंत दु:ख नष्ट होत नाही. नकारात्मकता हा मानवाचा मोठा शत्रू आहे. शांती, बंधुभाव व प्रेमानेच मनातील नकारात्मकता लोप पावत असते. विविध प्रकारच्या कार्यक्रमातून धम्मकुटीचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक उपासकाचे कर्तव्य आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त होणार्‍या धम्मसोहळ्याला प्रत्येकाने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयाराम भालाधरे यांनी मांडले. संचालन पी.एन. जगझापे यांनी केले. आभार डॉ. अजय अंबादे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया, समता सैनिक दल, अर्जुनी/मोर, सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील बौद्ध बांधवांनी सहकार्य घेतले. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजनदास व धम्मरसाचे वाटप देखील करण्यात आले. (वार्ताहर)