शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

दिलासादायक ! दोन नवीन कोरोना बाधितांची भर, तर आठ रुग्णांची सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १, तर इतर जिल्हा व राज्यातील २ रुग्ण आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात आता ५२ क्रियाशील रुग्ण : मात्र सतर्कता बाळगण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावताना दिसत असतानाच जिल्ह्यात मात्र कोरोना नियंत्रणात आहे. यामुळेच गुरुवारी (दि.१८) जिल्ह्यात २ नवीन बाधितांची भर पडली असून आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४,३०८ एवढी झाली असून, १४,०७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता ५२ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उरले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १, तर इतर जिल्हा व राज्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, राज्यात कोरोना पुन्हा फोफावत असून, याकडे लक्ष देत राज्य शासनाकडून पुन्हा काही निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातही त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात फोफावत असतानाच विदर्भाला केंद्रीय समितीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशात जिल्ह्यात जरी कोरोना नियंत्रणात असला तरीही जिल्हावासीयांनी आता आणखी सतर्कतेने वागण्याची गरज आहे. यासाठी मास्कचा नियमित वापर, शारीरिक अंतराचे पालन व वारंवार हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अंमल करावाच लागणार आहे. चाचण्या वाढविण्यावर भर कोरोनाचा उद्रेक बघता आता जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, चाचण्या वाढविल्या जाणार आहेत. तर आतापर्यंत १,३५,९९९ चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. यामध्ये ६८,५४२ आरटी-पीसीआर चाचण्या असून त्यात ८,४४६ पॉझिटिव्ह, तर ५६,८४६ चाचण्या निगेटिव्ह आहेत. तसेच ६७,४५७ रॅपीड ॲंटिजेन चाचण्या असून, यातील ६,१५७ पॉझिटिव्ह, तर ६,१३०० चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मास्क लावा अन्यथा दंड राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता मास्क व लावणाऱ्यांना थेट दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश काढले असून, मास्क व लावता फिरणाऱ्यांना १०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा उद्रेक आता अत्यंत धोकादायक ठरणार आहे. अशात नागरिकांनी पैसे वाचविण्यासाठी नव्हे तर आपला जीव वाचविण्यासाठी मास्क लावणे गरजेचे झाले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू