शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

थंडी व पावसात चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

मागील आठवड्याभरात जिल्ह्याचा पारा ५ अंशावर गेला होता. बोचरी थंडी व त्यात अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे घरात बसून राहणेही कठीण होत आहे. थंडी बघता जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने थंडी व पावसाचा जोर कायम असून असे हे वातावरणा लहान मुले व वृद्धांसाठी फारच कठीण असते.

ठळक मुद्देशाळांना सुटी देण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २६ डिसेंबरपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसू लागला आहे. परिणामी थंडीचा जोर वाढला असून पारा ५ अंशांवर पोहोचला होता. बोचऱ्या थंडीमुळे सर्वांचेच हाल होत असतानाही चिमुकल्यांना शाळेत जावे लागत आहे. मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळांना प्रशासनाकडून सुटी देण्यात आली नाही. परिणामी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत थंडी व अवकाळी पाऊस बघता शाळांना सुटी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.मागील आठवड्याभरात जिल्ह्याचा पारा ५ अंशावर गेला होता. बोचरी थंडी व त्यात अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे घरात बसून राहणेही कठीण होत आहे. थंडी बघता जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने थंडी व पावसाचा जोर कायम असून असे हे वातावरणा लहान मुले व वृद्धांसाठी फारच कठीण असते. असे असतानाही मात्र जिल्ह्यातील शाळांकडून वातावरण बघता सुटी जाहीर करण्यात आली नाही. परिणामी सकाळी उठून चिमुकल्यांना शाळेची धाव घ्यावी लागत आहे.इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता आजचे हे वातावरण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मात्र शाळांना सुटी नसल्याने माय-बाय त्यांना शाळेत धाडत आहेत. अगोदरच थंडी आहे, त्यात पाऊस अधिकच भर घालत असल्याने हात-पाय गारठत आहेत. या वातावरणाला बघता भलेभले घराबाहेर निघणे टाळत असून घरातही गरम कपड्यांत दडून बसत आहेत. असे असताना मात्र शाळा संचालक व जिल्हा प्रशासनाला चिमुकल्यांच्या आरोग्याशी कसलेच घेणे-देणे नसल्याचे दिसत आहे.वातावरण बघता शाळांना काही दिवस सुटी जाहीर करावी अशी मागणी पालकांसह सुज्ञ नागरिक करीत आहेत.विशेष म्हणजे, जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देत निर्णय घेण्याची गरज आहे.वज्रघात, गारपीट व पावसाचा इशाराहवामान खात्याकडून मागील आठ दिवसांपासून पाऊस, वीज व गारपीटीचा इशारा दिला जात आहे. त्यानुसार, शुक्रवारीही (दि.३) वज्रघात, गारपीट व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने चिमुकल्यांचे आरोग्य व त्यांनी सुरक्षा लक्षात घेता सुटी जाहीर करण्याची गरज आहे. खासगी शाळांकडून स्वमर्जीने सुटी जाहीर केली जाणार नाहीच. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून काय तो निर्णय त्वरीत घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊस