शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रोजगारहमीचे २४१ ग्रामपंचायतींमधील काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:43 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्राम पंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक काम करीत आहेत.

ठळक मुद्देयोजना थंडावली : फक्त १९ हजार लोकांना काम, मागीलवर्षीच्या तुलनेत मजूर कमी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्राम पंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक काम करीत आहेत. परंतु मागील वर्षी याचवेळी ७० हजार मजुरांच्या हाताला काम होते.जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायत आहेत. यातील ३०५ ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेतर्फे मनरेगाची १०७२ कामे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ८१ ग्रामपंचायतमध्ये १३८ कामे सुरू आहेत. या कामांवर १९६९ मजूर काम करीत आहेत. तिरोडा तालुक्यात ५६ ग्रामपंचायतमध्ये २१७ कामे सुरू आहेत असून ३२५९ मजूर काम करीत आहेत. आमगाव तालुक्यात ३२ ग्रामपंचायतमध्ये १२४ कामे सुरू असून २०१६ मजूर काम करीत आहेत.देवरी तालुक्यात २१ ग्रामपंचायतमध्ये १११ कामे सुरू असून १५९५ मजूर काम करीत आहेत. गोरेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतमध्ये ७२ कामे सुरू असून १४१२ मजूर काम करीत आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ३८ ग्राम पंचायतमध्ये १७६ कामे सुरू असून २२१७ मजूर काम करीत आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१ ग्रामपंचायतमध्ये ६८ कामे सुरू असून २१९० मजूर काम करीत आहेत. सालेकसा तालुक्यात ३१ ग्रामपंचायतमध्ये १६६ कामे सुरू असून ४३९६ मजूर काम करीत आहेत.तलाव खोलीकरणाच्या ४० कामांवर ९९७२ मजूरजिल्ह्यात सध्या १०७२ कामे सुरू आहेत. यातील सर्वाधीक कामे तलाव खोलीकरणाची असून ४० कामांवर ९९७२ लोकांना काम मिळत आहे. इंदिरा आवास योजनेच्या ६८७ कामांवर २९८०, कालवे व नाला सरळीकरणाच्या १३ कामांवर १७३७, नर्सरीच्या १४७ कामांवर ११७३ लोकांना काम मिळत आहे. याचप्रकारे भातखाचरच्या ५३ कामांवर १०६१ मजूर, पांदण, सिमेंट, मुरुम रस्ता व पूलाच्या ४ कामांवर ८५२, शोषखड्याच्या १९ कामांवर ५७८ मजूर, बकरी व गायीचे गोठे तयार करण्याच्या ५० कामांवर ३७६ मजूर, शौचालयाच्या ४२ कामांवर १६९ तर विहिरींच्या १७ कामांवर १५६ मजुरांना काम देण्यात आले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत २७.०१ टक्केच मजूरांना काममागील वर्षी याच काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत ३८५ ग्रामपंचायतमध्ये १०४२ काम सुरू होते. त्यात ७० हजार ५४० लोकांना काम देण्यात आले होते. परंतु यंदा १०७२ कामांवर फक्त १९ हजार ५४ म्हणजे २७.०१ टक्के लोकांनाच काम देण्यात आले आहे ही जिल्ह्याची शोकांतिका आहे.