शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

रोजगारहमीचे २४१ ग्रामपंचायतींमधील काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:43 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्राम पंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक काम करीत आहेत.

ठळक मुद्देयोजना थंडावली : फक्त १९ हजार लोकांना काम, मागीलवर्षीच्या तुलनेत मजूर कमी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्राम पंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक काम करीत आहेत. परंतु मागील वर्षी याचवेळी ७० हजार मजुरांच्या हाताला काम होते.जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायत आहेत. यातील ३०५ ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेतर्फे मनरेगाची १०७२ कामे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ८१ ग्रामपंचायतमध्ये १३८ कामे सुरू आहेत. या कामांवर १९६९ मजूर काम करीत आहेत. तिरोडा तालुक्यात ५६ ग्रामपंचायतमध्ये २१७ कामे सुरू आहेत असून ३२५९ मजूर काम करीत आहेत. आमगाव तालुक्यात ३२ ग्रामपंचायतमध्ये १२४ कामे सुरू असून २०१६ मजूर काम करीत आहेत.देवरी तालुक्यात २१ ग्रामपंचायतमध्ये १११ कामे सुरू असून १५९५ मजूर काम करीत आहेत. गोरेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतमध्ये ७२ कामे सुरू असून १४१२ मजूर काम करीत आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ३८ ग्राम पंचायतमध्ये १७६ कामे सुरू असून २२१७ मजूर काम करीत आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१ ग्रामपंचायतमध्ये ६८ कामे सुरू असून २१९० मजूर काम करीत आहेत. सालेकसा तालुक्यात ३१ ग्रामपंचायतमध्ये १६६ कामे सुरू असून ४३९६ मजूर काम करीत आहेत.तलाव खोलीकरणाच्या ४० कामांवर ९९७२ मजूरजिल्ह्यात सध्या १०७२ कामे सुरू आहेत. यातील सर्वाधीक कामे तलाव खोलीकरणाची असून ४० कामांवर ९९७२ लोकांना काम मिळत आहे. इंदिरा आवास योजनेच्या ६८७ कामांवर २९८०, कालवे व नाला सरळीकरणाच्या १३ कामांवर १७३७, नर्सरीच्या १४७ कामांवर ११७३ लोकांना काम मिळत आहे. याचप्रकारे भातखाचरच्या ५३ कामांवर १०६१ मजूर, पांदण, सिमेंट, मुरुम रस्ता व पूलाच्या ४ कामांवर ८५२, शोषखड्याच्या १९ कामांवर ५७८ मजूर, बकरी व गायीचे गोठे तयार करण्याच्या ५० कामांवर ३७६ मजूर, शौचालयाच्या ४२ कामांवर १६९ तर विहिरींच्या १७ कामांवर १५६ मजुरांना काम देण्यात आले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत २७.०१ टक्केच मजूरांना काममागील वर्षी याच काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत ३८५ ग्रामपंचायतमध्ये १०४२ काम सुरू होते. त्यात ७० हजार ५४० लोकांना काम देण्यात आले होते. परंतु यंदा १०७२ कामांवर फक्त १९ हजार ५४ म्हणजे २७.०१ टक्के लोकांनाच काम देण्यात आले आहे ही जिल्ह्याची शोकांतिका आहे.