शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस धान खरेदी बंद

By admin | Updated: December 7, 2014 22:53 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला.

व्यापाऱ्यांचा निर्णय : १० डिसेंबरला व्यापारी संघटनेतर्फे साखळी उपोषणअर्जुनी/मोरगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला. तर १० डिसेंबर रोजी तालुका व्यापारी संघटनेतर्फे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी व धान व्यापारी संघटनेत जुंपली होती. यावर सभापतींनी ५ डिसेंबर रोजी तीन धान व्यापाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुरुवारी कृ.उ.बा.स. च्या संचालक मंडळाची सभा होती. काही व्यापारी आपल्या समस्या घेऊन तेथे पोहोचल असता सभा आटोपली असे त्यांना सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी व संचालक सत्यनारायण चांडक यांच्या परवानगीने व्यापारी सभागृहात पोहोचले. व्यापाऱ्यांनी सभापतींना समस्या सांगितल्या. त्या त्यांनी ऐकून घेतल्या नाहीत. यावर्षी धानाचे एक हजार ५०० रुपये प्रति क्विंटल सेस फी वसूल करण्यात येईल व तांदळाचे भाव दोन हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे संचालक मंडळ व कोणालाही विश्वासात न घेता स्वमर्जीने सभापतींनी ठरविले. यासंदर्भात त्यांना विचारणा केली तर ते उद्धट शब्दात बोलतात व स्वत:च सभागृहांच्या बाहेर जाण्यास बाध्य करतात. उलट पोलीस ठाण्यात त्यांनी व्यापाऱ्यांविरूध्द खोटी तक्रार केली. बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांना कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण झालेले नाही. ते नसतांनाही व्यापाऱ्यांकडून अवैधरित्या बाजार फी वसूल केली जाते. वडसा, लाखनी, लाखांदूर, ब्रम्हपुरी या ठिकाणच्या बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने शेतमालावर ७० टक्के कर्ज दिले जाते. हा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळत नाही व ते व्यापाऱ्यांना गोदाम भाड्याने दिले जाते. आधारभूत धानाचे शासकीय दर केंद्रशासन ठरवितो. एक हजार ३६० रुपये प्रति क्विंटल दर ठरविले असतांनाही संचालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता एक हजार ५०० रुपये प्रति क्विंटल व्यापाऱ्यांकडून बाजार फी वसूल करण्याचा निर्णय सभापती कुरैशी व सचिव काळबांधे यांनी घेतला असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या सर्व अन्यायाविरूध्द व्यापाऱ्यांनी ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद ठेवण्याचा एका सभेत निर्णय घेतला आहे. सभापतींच्या कृतीचा राईस मिलर्स, व्यापारी अडते, हमाल संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)