शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

बंद दाराआड लग्नसोहळे धडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हयासाठी आदेश काढले आहेत. मात्र या निर्बंधांना जिल्हयात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोह‌ळे आटोपले जात आहेत. 

ठळक मुद्देनिर्बंधांना दिली जात आहे बगल : लढविली जात आहे वेगवेगळी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने पुन्हा एकदा लग्न सोह‌ळ्यांवर काही निर्बंध लावले आहेत. मात्र शहरात या निर्बंधांना बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी सभागृह व हॉटेल्सवाले वेगवेगळ्या शक्कल लढवित असून बंद दाराआड लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हयासाठी आदेश काढले आहेत. मात्र या निर्बंधांना जिल्हयात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोह‌ळे आटोपले जात आहेत. अशात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार यात शंका नसून जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे ही बाब नक्कीच गंभीर आहे. मात्र होत असलेली कमाई हातून जावू नये यासाठी सभागृह व हॉटेल्सवालेही वेगवेगळी शक्कल लढवून लग्नसोह‌ळे आटोपून घेत आहेत. यासाठी रात्री ठरवून दिलेल्या १० वाजतानंतर सभागृह व हॉटेल्सचे दार बंद करून आतमध्ये कार्यक्रम सुरूच असल्याचेही ऐकीवात असून तशा तक्रारीही येत आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारे आयोजन केले जात असले तरिही हा प्रकार पुढे जाऊन धोकादायक ठरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

ना तपासणी ना कारवाई गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार नगर परिषद- नगर पंचायत मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन, कोचिंग क्लासेस आदी गर्दी होणाऱ्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करावयाची आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास उचत दंड आकारावा किंवा कारवाई कराव असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्हा व शहरात असे होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात आटोपले जात असल्याचे चित्र आहे.वाहनांची पार्कींग अन्य ठिकाणीसभागृह व हॉटेल्समध्ये लग्न सोहळे व अन्य कार्यक्रमात येणाऱ्यांचे वाहन समोरच लावल्यास कारवाईची भीती आहे. अशात या सभागृह व हॉटेल्स वाल्यांकडून कार्यक्रमात आलेल्या लोकांचे मोजकेच वाहन समोर लावले जात आहेत. तर अन्य वाहनांची पर्कींग मात्र अन्यत्र केली जात आहे. अशात कुणी पाहणी करण्यासाठी आले तरिही वाहनांना बघून त्यांना गर्दीचा अंदाज येणार नाही. मात्र बंद दाराआड गर्दीत कार्यक्रम आटोपले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या