शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बंद दाराआड लग्नसोहळे धडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हयासाठी आदेश काढले आहेत. मात्र या निर्बंधांना जिल्हयात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोह‌ळे आटोपले जात आहेत. 

ठळक मुद्देनिर्बंधांना दिली जात आहे बगल : लढविली जात आहे वेगवेगळी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने पुन्हा एकदा लग्न सोह‌ळ्यांवर काही निर्बंध लावले आहेत. मात्र शहरात या निर्बंधांना बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी सभागृह व हॉटेल्सवाले वेगवेगळ्या शक्कल लढवित असून बंद दाराआड लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हयासाठी आदेश काढले आहेत. मात्र या निर्बंधांना जिल्हयात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोह‌ळे आटोपले जात आहेत. अशात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार यात शंका नसून जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे ही बाब नक्कीच गंभीर आहे. मात्र होत असलेली कमाई हातून जावू नये यासाठी सभागृह व हॉटेल्सवालेही वेगवेगळी शक्कल लढवून लग्नसोह‌ळे आटोपून घेत आहेत. यासाठी रात्री ठरवून दिलेल्या १० वाजतानंतर सभागृह व हॉटेल्सचे दार बंद करून आतमध्ये कार्यक्रम सुरूच असल्याचेही ऐकीवात असून तशा तक्रारीही येत आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारे आयोजन केले जात असले तरिही हा प्रकार पुढे जाऊन धोकादायक ठरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

ना तपासणी ना कारवाई गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार नगर परिषद- नगर पंचायत मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन, कोचिंग क्लासेस आदी गर्दी होणाऱ्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करावयाची आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास उचत दंड आकारावा किंवा कारवाई कराव असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्हा व शहरात असे होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात आटोपले जात असल्याचे चित्र आहे.वाहनांची पार्कींग अन्य ठिकाणीसभागृह व हॉटेल्समध्ये लग्न सोहळे व अन्य कार्यक्रमात येणाऱ्यांचे वाहन समोरच लावल्यास कारवाईची भीती आहे. अशात या सभागृह व हॉटेल्स वाल्यांकडून कार्यक्रमात आलेल्या लोकांचे मोजकेच वाहन समोर लावले जात आहेत. तर अन्य वाहनांची पर्कींग मात्र अन्यत्र केली जात आहे. अशात कुणी पाहणी करण्यासाठी आले तरिही वाहनांना बघून त्यांना गर्दीचा अंदाज येणार नाही. मात्र बंद दाराआड गर्दीत कार्यक्रम आटोपले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या