शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बंद दाराआड लग्नसोहळे धडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हयासाठी आदेश काढले आहेत. मात्र या निर्बंधांना जिल्हयात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोह‌ळे आटोपले जात आहेत. 

ठळक मुद्देनिर्बंधांना दिली जात आहे बगल : लढविली जात आहे वेगवेगळी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने पुन्हा एकदा लग्न सोह‌ळ्यांवर काही निर्बंध लावले आहेत. मात्र शहरात या निर्बंधांना बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी सभागृह व हॉटेल्सवाले वेगवेगळ्या शक्कल लढवित असून बंद दाराआड लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आता कोरोना पुन्हा फोफावला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाने लग्न सोहळे व गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले असून ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हयासाठी आदेश काढले आहेत. मात्र या निर्बंधांना जिल्हयात बगल देत लग्न सोहळे धडाक्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नये असे स्पष्ट आदेश असतानाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न सोह‌ळे आटोपले जात आहेत. अशात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार यात शंका नसून जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे ही बाब नक्कीच गंभीर आहे. मात्र होत असलेली कमाई हातून जावू नये यासाठी सभागृह व हॉटेल्सवालेही वेगवेगळी शक्कल लढवून लग्नसोह‌ळे आटोपून घेत आहेत. यासाठी रात्री ठरवून दिलेल्या १० वाजतानंतर सभागृह व हॉटेल्सचे दार बंद करून आतमध्ये कार्यक्रम सुरूच असल्याचेही ऐकीवात असून तशा तक्रारीही येत आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारे आयोजन केले जात असले तरिही हा प्रकार पुढे जाऊन धोकादायक ठरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

ना तपासणी ना कारवाई गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार नगर परिषद- नगर पंचायत मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन, कोचिंग क्लासेस आदी गर्दी होणाऱ्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करावयाची आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास उचत दंड आकारावा किंवा कारवाई कराव असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. मात्र जिल्हा व शहरात असे होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात आटोपले जात असल्याचे चित्र आहे.वाहनांची पार्कींग अन्य ठिकाणीसभागृह व हॉटेल्समध्ये लग्न सोहळे व अन्य कार्यक्रमात येणाऱ्यांचे वाहन समोरच लावल्यास कारवाईची भीती आहे. अशात या सभागृह व हॉटेल्स वाल्यांकडून कार्यक्रमात आलेल्या लोकांचे मोजकेच वाहन समोर लावले जात आहेत. तर अन्य वाहनांची पर्कींग मात्र अन्यत्र केली जात आहे. अशात कुणी पाहणी करण्यासाठी आले तरिही वाहनांना बघून त्यांना गर्दीचा अंदाज येणार नाही. मात्र बंद दाराआड गर्दीत कार्यक्रम आटोपले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या