शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पठाणटोला येथील क्रशर बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 22:18 IST

गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या जागेवर अतिक्रमण : पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा-तेढा : गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे. यावर गावकरी व प्राथमिक शाळेकडून हे क्रशर बंद करण्याची मागणी केली जात असून पालकमंत्र्यांसह अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.हे स्टोन क्रशर राकेश ईश्वरदास अग्रवाल (रा.गोंदिया) यांच्य मालकीचे असून गावापासून फक्त २०० मीटर अंतरावर आहे. क्रशर रात्रंदिवस सुरू राहत असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात आवाज व धूर येतो. आवाजामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणे अवघड झाले आहे. शिवाय जे विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणाला जातात त्यांना रात्री अभ्यास करणे कठीण झाले आहे. तर धुरामुळे गावातील लोकांचे जिवन जगणे असहनिय झाले आहे.क्रशर गावातील तळे व शेतीला लागून असल्यामुळे तळ््यातील पाण्यावर धूळ साचत असून पाणी दुषीत होत आहे. अशात तळ््यातील पाणी प्राशन केल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेतात धूळ जात असल्याने धुराचे थर तयार होऊन शेती दिवसेंदिवस नापिक होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. या क्रशरची जागा ०.५० हेआर आहे. माज्ञ क्रशर मालल क्रशरसाठी लागणारा कच्चा व पक्का माल वन विभागाच्या सुमारे ०.८० हेआर जागेत ठेवत आहे. असे असतानाही वन विभागाकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने शंका व्यक्त केली जात आहे. यात मात्र गावकऱ्यांना गुरे चारण्यास अडचण होत आहे. त्याचप्रकारे तळ््यातील अधिकचे पाणी निघण्याच्या जागेवर क्रशर मालकाने अतिक्रमण केल्यामुळे ते पाणी आता शेतातून जात असून त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे. क्रशरमधील जड वाहनांमुळे गावातील रस्त्यांची दुर्गत झाली आहे. त्यातही क्रशर मालक रॉयल्टी पेक्षा जास्त खनिजाची विक्री करीत असल्याचे समजते. त्यामुळे हे क्रशर बंद करावे अशी मागणी गावकरी व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे.अन्यथा अधिकारीच राहतील जबाबदारक्रशर बंद करून गावकऱ्यांच्या जिवनाशी खेळणे थांबविण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले, तहसीलदार, खनिकर्म विभाग व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे, क्रशर बंद न केल्यास भविष्यात होणाऱ्या हानिला मंजुरी देणारे अधिकारीच जबाबदार राहतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेTahasildarतहसीलदार